शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

औरंगाबाद जिल्ह्यात कार-ट्रक अपघातात दोन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:15 IST

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावरील सटाणा फाट्यावर घडला.

ठळक मुद्देसटाणा फाटा : जालना रोडवर मंगळवारी रात्रीची घटना; उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह अमरावतीकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्ककरमाड : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावरील सटाणा फाट्यावर घडला.या अपघातात सागर गणेशराव फेरण (३२) व दिलीप दादाजी पराते (४३,रा. प्रवीणनगर, अमरावती) हे दोघे ठार झाले. राहुल गणेशराव फेरण (२९) हे जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहे.अमरावती येथील पराते व फेरण हे रविवारी आयपीएल मॅच पाहण्यासाठी पुण्याला गेले होते. सोमवारी दुपारी ते पुणे येथून कारने (क्र. एम. एच.०४ ई डब्ल्यू ६७९४) अमरावतीकडे परतत असताना मंगळवारी रात्री १२.३० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर सटाणा फाट्याजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. दुभाजक तोडून ही कार जालनाकडून औरंगाबादकडे जाणाºया ट्रकवर (क्र.एम. पी.२० एच बी ५२४०) धडकली. दोन्ही वाहने भरधाव असल्याने भीषण अपघात होऊन चुराडा झालेली कार ट्रकमध्ये जाऊन अडकली. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. पी. कोळी, फौजदार प्रदीप भिवसने, जमादार रवींद्र साळवे, रमेश धस, सूर्यकांत पाटील, राहुल मोहतमल,आदिनाथ उकर्डे यांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने वेगळी केली. त्यानंतर कटरने कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेतून घाटी दवाखान्यात दाखल केले.ट्रकचालक मोहंमद इरफान मसुरी (३२,रा. पिपरिया, ता. पाटण, जि. जबलपूर, मध्य प्रदेश) हा स्वत:हून करमाड पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले यांनी भेट दिली. अधिक तपास फौजदार प्रदीप भिवसने करीत आहेत.आदिवासी विभागातील कार्यालयीन व्यवस्थापकाचा मृतांत समावेशअपघातात ठार झालेले सागर फेरण हे नाशिक येथे आदिवासी विभागात कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते, तर दिलीप पराते यांचे अमरावती येथे मेडिकल दुकान आहे.फेरण व पराते यांच्या पार्थिवाचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊनमंगळवारी दुपारी ३ वाजता अमरावतीकडे रवाना झाले.ट्रकचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध वाहन निष्काळजीपणे चालवून अपघातास करणीभूत ठरल्याचा गुन्हा करमाड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू