शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:31 IST

वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

पाच दिवसांची विश्रांती : निम्मे कंत्राटी कामगार न परतल्याने ठेकेदाराची डोकेदुखी वाढलीवाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज उद्योगनगरीतील बहुतांश कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळीसाठी पाच दिवसांची सुटी देण्यात आली होती. बहुतांश कामगार ७ नोव्हेंबरपासून मुळगावी गेले होते. कामगार रविवारपासून उद्योगनगरीत परतण्यास सुरवात झाली होती. सोमवारपासून उद्योगनगरीत कारखाने सुरु झाले असून, बहुतांश कायमस्वरुपी कामगार कामावर हजर झाले. मात्र, ५० टक्के कंत्राटी कामगार कामावर न आल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगनगरीत १ लाखाच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना मर्यादित सुट्या असल्यामुळे तसेच एकदा कामावर हजर झाल्यानंतर लवकर सुट्या मिळत नसल्यामुळे हे कामगार उशिराने कामावर परत येत असल्याचा अनुभव उद्योजक मंडळीना असतो.

दिवाळीत बहुतांश कंत्राटी कामगार कामावर लवकर परत येत नसल्यामुळे लघु उद्योजक दसऱ्यानंतर वर्क आॅर्डरचे काम करुन मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या मटेरियल व साहित्याचा स्टॉक करुन ठेवतात. यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मटेरियल चार ते पाच दिवस पुरेल अशी तजवीज लघु उद्योजकांनी केलेली असते. मात्र, कंत्राटी कामगार उशिरा कामावर परत आल्यास उत्पादन प्रकिया मंदावण्याची भिती दिंगबर मुळे, राहुल मोगले, अनिल पाटील, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, अर्जुन आदमाने, डॉ. शिवाजीराव कान्हेरे या लघु उद्योजकांनी वर्तविली आहे.

कामगार पुरविणारे ठेकेदार त्रस्तकामगारांची चणचण भासत असल्यामुळे उद्योजकाकडून ठेकेदारांना कामगार पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ठेकेदार व सुपरवायझरकडून गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना लवकर कामावर हजर होण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे काही ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गावी गेलेले कामगार लवकरच परत येतील, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद