शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
3
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
4
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
5
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
6
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
7
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
8
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
9
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
10
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
11
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
12
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
13
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
14
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
15
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
16
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
17
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
18
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
19
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
20
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:31 IST

वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

पाच दिवसांची विश्रांती : निम्मे कंत्राटी कामगार न परतल्याने ठेकेदाराची डोकेदुखी वाढलीवाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज उद्योगनगरीतील बहुतांश कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळीसाठी पाच दिवसांची सुटी देण्यात आली होती. बहुतांश कामगार ७ नोव्हेंबरपासून मुळगावी गेले होते. कामगार रविवारपासून उद्योगनगरीत परतण्यास सुरवात झाली होती. सोमवारपासून उद्योगनगरीत कारखाने सुरु झाले असून, बहुतांश कायमस्वरुपी कामगार कामावर हजर झाले. मात्र, ५० टक्के कंत्राटी कामगार कामावर न आल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगनगरीत १ लाखाच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना मर्यादित सुट्या असल्यामुळे तसेच एकदा कामावर हजर झाल्यानंतर लवकर सुट्या मिळत नसल्यामुळे हे कामगार उशिराने कामावर परत येत असल्याचा अनुभव उद्योजक मंडळीना असतो.

दिवाळीत बहुतांश कंत्राटी कामगार कामावर लवकर परत येत नसल्यामुळे लघु उद्योजक दसऱ्यानंतर वर्क आॅर्डरचे काम करुन मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या मटेरियल व साहित्याचा स्टॉक करुन ठेवतात. यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मटेरियल चार ते पाच दिवस पुरेल अशी तजवीज लघु उद्योजकांनी केलेली असते. मात्र, कंत्राटी कामगार उशिरा कामावर परत आल्यास उत्पादन प्रकिया मंदावण्याची भिती दिंगबर मुळे, राहुल मोगले, अनिल पाटील, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, अर्जुन आदमाने, डॉ. शिवाजीराव कान्हेरे या लघु उद्योजकांनी वर्तविली आहे.

कामगार पुरविणारे ठेकेदार त्रस्तकामगारांची चणचण भासत असल्यामुळे उद्योजकाकडून ठेकेदारांना कामगार पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ठेकेदार व सुपरवायझरकडून गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना लवकर कामावर हजर होण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे काही ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गावी गेलेले कामगार लवकरच परत येतील, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद