शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:31 IST

वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

पाच दिवसांची विश्रांती : निम्मे कंत्राटी कामगार न परतल्याने ठेकेदाराची डोकेदुखी वाढलीवाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज उद्योगनगरीतील बहुतांश कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळीसाठी पाच दिवसांची सुटी देण्यात आली होती. बहुतांश कामगार ७ नोव्हेंबरपासून मुळगावी गेले होते. कामगार रविवारपासून उद्योगनगरीत परतण्यास सुरवात झाली होती. सोमवारपासून उद्योगनगरीत कारखाने सुरु झाले असून, बहुतांश कायमस्वरुपी कामगार कामावर हजर झाले. मात्र, ५० टक्के कंत्राटी कामगार कामावर न आल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगनगरीत १ लाखाच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना मर्यादित सुट्या असल्यामुळे तसेच एकदा कामावर हजर झाल्यानंतर लवकर सुट्या मिळत नसल्यामुळे हे कामगार उशिराने कामावर परत येत असल्याचा अनुभव उद्योजक मंडळीना असतो.

दिवाळीत बहुतांश कंत्राटी कामगार कामावर लवकर परत येत नसल्यामुळे लघु उद्योजक दसऱ्यानंतर वर्क आॅर्डरचे काम करुन मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या मटेरियल व साहित्याचा स्टॉक करुन ठेवतात. यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मटेरियल चार ते पाच दिवस पुरेल अशी तजवीज लघु उद्योजकांनी केलेली असते. मात्र, कंत्राटी कामगार उशिरा कामावर परत आल्यास उत्पादन प्रकिया मंदावण्याची भिती दिंगबर मुळे, राहुल मोगले, अनिल पाटील, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, अर्जुन आदमाने, डॉ. शिवाजीराव कान्हेरे या लघु उद्योजकांनी वर्तविली आहे.

कामगार पुरविणारे ठेकेदार त्रस्तकामगारांची चणचण भासत असल्यामुळे उद्योजकाकडून ठेकेदारांना कामगार पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ठेकेदार व सुपरवायझरकडून गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना लवकर कामावर हजर होण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे काही ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गावी गेलेले कामगार लवकरच परत येतील, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद