शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजच्या उद्योगनगरीत यंत्रांची धडधड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:31 IST

वाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

पाच दिवसांची विश्रांती : निम्मे कंत्राटी कामगार न परतल्याने ठेकेदाराची डोकेदुखी वाढलीवाळूज महानगर: पाच दिवसांच्या विश्रांतीनगर वाळूज उद्योगनगरीतील यंत्रांची धडधड सोमवारपासून पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, दिवाळीसाठी मुळगावी गेलेले जवळपास अर्धे कामगार उद्योगनगरीत न परतल्याने ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज उद्योगनगरीतील बहुतांश कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना दिवाळीसाठी पाच दिवसांची सुटी देण्यात आली होती. बहुतांश कामगार ७ नोव्हेंबरपासून मुळगावी गेले होते. कामगार रविवारपासून उद्योगनगरीत परतण्यास सुरवात झाली होती. सोमवारपासून उद्योगनगरीत कारखाने सुरु झाले असून, बहुतांश कायमस्वरुपी कामगार कामावर हजर झाले. मात्र, ५० टक्के कंत्राटी कामगार कामावर न आल्यामुळे कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. उद्योगनगरीत १ लाखाच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना मर्यादित सुट्या असल्यामुळे तसेच एकदा कामावर हजर झाल्यानंतर लवकर सुट्या मिळत नसल्यामुळे हे कामगार उशिराने कामावर परत येत असल्याचा अनुभव उद्योजक मंडळीना असतो.

दिवाळीत बहुतांश कंत्राटी कामगार कामावर लवकर परत येत नसल्यामुळे लघु उद्योजक दसऱ्यानंतर वर्क आॅर्डरचे काम करुन मोठ्या कंपन्यांनी दिलेल्या मटेरियल व साहित्याचा स्टॉक करुन ठेवतात. यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मटेरियल चार ते पाच दिवस पुरेल अशी तजवीज लघु उद्योजकांनी केलेली असते. मात्र, कंत्राटी कामगार उशिरा कामावर परत आल्यास उत्पादन प्रकिया मंदावण्याची भिती दिंगबर मुळे, राहुल मोगले, अनिल पाटील, मसिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दक, अब्दुल शेख, अर्जुन गायकवाड, अर्जुन आदमाने, डॉ. शिवाजीराव कान्हेरे या लघु उद्योजकांनी वर्तविली आहे.

कामगार पुरविणारे ठेकेदार त्रस्तकामगारांची चणचण भासत असल्यामुळे उद्योजकाकडून ठेकेदारांना कामगार पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे ठेकेदार व सुपरवायझरकडून गावी गेलेल्या कामगारांशी संपर्क साधून त्यांना लवकर कामावर हजर होण्यासाठी विनवणी केली जात असल्याचे काही ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गावी गेलेले कामगार लवकरच परत येतील, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीAurangabadऔरंगाबाद