शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्त्यांच्या कामाकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:55 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दलित वस्तीतील रहिवाशांना आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने जिल्ह्याकरिता सुमारे ३० कोटी ७८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाददलित वस्तीतील रहिवाशांना आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने जिल्ह्याकरिता सुमारे ३० कोटी ७८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १ हजार ६७ कामांना मान्यता देण्यात आली. सदरील कामे युद्धपाळीवर पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, दीड वर्षांचा कालावधी लोटत आला असतानाही मे २०१६ अखेर केवळ ४५ कामे पूर्ण झाली असून ९७० कामांचे अद्याप उद्घाटनही झालेले नाही. आजही अनेक दलित वस्त्यांमध्ये धड रस्ते नाहीत. पाणीपुरवठ्याच्या सुविधा नाहीत. ज्या वस्तीमध्ये रस्ते तयार करण्यात आले तेथे नाल्यांचा पत्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरांमध्ये घुसते. अशा एक ना अनेक प्रश्नांना रहिवाशांना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊनच दलित वस्त्यांमध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी सुमारे ३० कोटी ७८ लाख ८२ हजार ८०४ रूपये एवढी तरतूद शासनाने मंजूर केली. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यासाठी ६ कोटी ९८ लाख ३९ हजार ८०४ रूपये, उमरग्यासाठी ४ कोटी ९५ लाख, लोहाऱ्यासाठी २ कोटी ४४ लाख ९५ हजार, तुळजापूर ५ कोटी ३९ लाख ५० हजार, भूम २ कोटी १२ लाख ३८ हजार, परंडा २ कोटी ६० हजार, कळंब ५ कोटी १९ लाख ३० हजार आणि वाशी तालुक्याच्या वाट्याला १ कोटी ६८ लाख ७० हजार रूपये एवढा निधी आला. दरम्यान, निधी मंजूर झाल्यानंतर आठ तालुक्यात मिळून १ हजार ६७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर उपरोक्त कामे युध्दपातळीवर पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. २०१५-१६ हे आर्थिक वर्ष सरले. आणि २०१६-१७ हेही वर्ष अर्धेअधिक सरले. असतानाही १ हजार ६७ पैकी केवळ ४५ कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसरीकडे ९७० कामांना अद्याप सुरूवातही करण्यात आलेली नाही.