शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कडधान्याच्या आयातीमुळे तूर हमीभावापासून वंचित : राजू शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 19:35 IST

हमीभाव, बाजार भावातील तफावत केंद्राने थेट द्यावी 

ठळक मुद्देमहाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या.

औरंगाबाद : केंद्राच्या चुकीच्या आयात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कडधान्याची आयात ४६ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी, बाजारपेठेत हमीभावापेक्षा तूर क्विंटलमागे १५०० रुपये कमी भाव मिळत आहे. ही तफावतीची रक्कम केंद्र सरकारकडून वसूल करण्यात यावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण बांधणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. पूर्वीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. या अंतर्गत आज औरंगाबादेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल ठरविला आहे. मात्र, प्रत्यक्षात अडत बाजारात तूर ४३००  ते ४४०० रुपये क्विंटलने विकत आहे. क्विंटलमागे १५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कारण केंद्राने १५ लाख टनाहून २३ लाख टनापर्यंत कडधान्याची आयात वाढविली आहे. यामुळे तुरीचे भाव घसरले आहेत. जर आयात झाली नसती तर आज तुरीला क्विंटलमागे ६५०० रुपये भाव मिळाला असता. एकरी ७ क्विंटल तूर उत्पादन होते. शेतकऱ्यांना एकरी १५ हजार ४०० रुपयांचा फटका बसत आहे. तफावतीची रक्कम राज्य शासनाने केंद्र सरकारकडून वसूल करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.  

महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल, अशा मोठ्या अपेक्षा होत्या. मुख्यमंत्री होण्याआधी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन आले होते. शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते आश्वासन हवेतच विरले. तुटपुंजी कर्जमाफी केली त्याचा फक्त प्रत्येक गावातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनाच फायदा झाला. उर्वरित ८५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून, सातबारा कोरा करा, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला. २२ फेब्रुवारी रोजी शिर्डीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी सूर्यकांत तुपकरी यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. 

...तर कापूस उत्पादकांना देऊ साथ राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली की, मराठवाड्यातील कापूस उत्पादक आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत नाहीत. जर कापूस उत्पादक रस्त्यावर उतरले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना साथ देईल.

स्वाभिमानी संघटना मनपा निवडणूक लढविणार राजू शेट्टी यांनी जाहीर केले की, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना लढविणार आहे. सध्या ६ ते ७ उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. चांगले उमेदवार भेटले तर आणखी जागा लढवू. पाणी, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्यांकडे आम्ही शहरवासीयांचे लक्ष वेधू, असेही त्यांनी नमूद केले. 

घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीस पाठिंबा बांगला देश, पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलून लावा, या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. मात्र सीएए, एनआरसीला आमचा पाठिंबा नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे चुकीचेकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकरी शेतीमाल विक्री करतात, त्यांना तेथील संचालक मंडळ निवडीचा अधिकार दिला पाहिजे. आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडीने रद्द केला. शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे चुकीचे आहे, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जात नसल्याने भाजप सरकारने संचालक मंडळ निवडीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.  

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र