शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेतीमालाला चांगली बाजारपेठ देण्याचा प्रयत्न;‘दमरे’ची राज्यातील पहिली किसान रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:59 IST

Kisan Railway नगरसोल स्थानकहून फलाट क्रमांक एकवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पहिली किसान रेल्वे रवाना झाली.

ठळक मुद्देदक्षिण मध्य रेल्वेची किसान रेल्वे मंगळवारी नगरसोलहून गुवाहाटीला रवाना झाली.किसान रेल्वेंद्वारे फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने किसान रेल्वे सुरु केली असून, राज्यातील पहिली किसान रेल्वे ५२२ टन कांद्ये घेऊन मंगळवारी नगरसोलहून गुवाहाटीला रवाना झाली.

नगरसोल स्थानकहून फलाट क्रमांक एकवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पहिली किसान रेल्वे रवाना झाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी ५० तासांच्या कालावधीत २ हजार ५०० कि.मी. अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांदे घेऊन ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता गुवाहाटी- आसाम येथे पोहोचेल.

दक्षिण मध्य रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी , यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. नगरसोल स्थानकातून माल गाड्यांमधून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असे. या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी नांदेड विभागाच्या मालवाहतूक विभागाने शेतकरी, व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या मालाची वाहतूक किसान रेल्वेने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने, कमी खर्चात, त्रास-मुक्त आणि जलद कशी करता येईल, या विषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वेच्या इतर सुलभ फायद्यांविषयी जागरूक केले. त्यातून अखेर ही रेल्वे सुरु झाली.

‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलादेखील कांद्याच्या वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजारrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद