शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शेतीमालाला चांगली बाजारपेठ देण्याचा प्रयत्न;‘दमरे’ची राज्यातील पहिली किसान रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:59 IST

Kisan Railway नगरसोल स्थानकहून फलाट क्रमांक एकवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पहिली किसान रेल्वे रवाना झाली.

ठळक मुद्देदक्षिण मध्य रेल्वेची किसान रेल्वे मंगळवारी नगरसोलहून गुवाहाटीला रवाना झाली.किसान रेल्वेंद्वारे फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने किसान रेल्वे सुरु केली असून, राज्यातील पहिली किसान रेल्वे ५२२ टन कांद्ये घेऊन मंगळवारी नगरसोलहून गुवाहाटीला रवाना झाली.

नगरसोल स्थानकहून फलाट क्रमांक एकवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पहिली किसान रेल्वे रवाना झाली. या किसान रेल्वेमध्ये प्रत्येकी २३ टन क्षमतेच्या २२ पार्सल व्हॅन आहेत. ही गाडी ५० तासांच्या कालावधीत २ हजार ५०० कि.मी. अंतर पार करून सुमारे ५२२ टन कांदे घेऊन ७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता गुवाहाटी- आसाम येथे पोहोचेल.

दक्षिण मध्य रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी , यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. नगरसोल स्थानकातून माल गाड्यांमधून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असे. या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी नांदेड विभागाच्या मालवाहतूक विभागाने शेतकरी, व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या मालाची वाहतूक किसान रेल्वेने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने, कमी खर्चात, त्रास-मुक्त आणि जलद कशी करता येईल, या विषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वेच्या इतर सुलभ फायद्यांविषयी जागरूक केले. त्यातून अखेर ही रेल्वे सुरु झाली.

‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल’ च्या अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलादेखील कांद्याच्या वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजारrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद