शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅरिक’मध्ये ‘ट्रंक’ पायाभूत सुविधा प्रणाली; सांडपाणी निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्यांचे काम प्रगती पथावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:33 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभ्या राहणाऱ्या आॅरिक सिटीत पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी सुरू आहे.

ठळक मुद्देदेशात ‘ट्रंक ’ ही भूमिगत पायाभूत सुविधा प्रणाली राबविणारे ‘आॅरिक ’ पहिलेच औद्योगिक क्षेत्र राहणार आहे.रस्ते, पदपथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधांचे ७० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत उभ्या राहणाऱ्या आॅरिक सिटीत पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी सुरू आहे. देशात ‘ट्रंक ’ ही भूमिगत पायाभूत सुविधा प्रणाली राबविणारे ‘आॅरिक ’ पहिलेच औद्योगिक क्षेत्र राहणार आहे.

‘डीएमआयसी’अंतर्गत  स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योगांचे हब ठरणार आहे. यासाठी ‘एमआयडीसी’ने शेंद्रा, लाडगाव- करमाड, डीएमआयसी टप्पा-१ यासाठी ८४६ हेक्टर क्षेत्र संपादित केले. ही जमीन हस्तांतरित करून ७८६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे कंत्राट दिले. यात रस्ते, सांडपाणी निचरा, भूमिगत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या, केबल नेटवर्क, पथदिवे, मोकळ्या जागांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. 

आॅरिक सिटीची उभारणी गतीने सुरूआहे. यामध्ये वाणिज्यिक, औद्योगिक आणि निवासी गरजेनुसार सोयीसुविधा होत आहेत. आगामी किमान पाच दशकांचा विचार करून पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. आजघडीला उद्योग आणि निवासासाठी आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये उच्च दाबासह सर्व विद्युत वाहिन्यांचे जाळे, सांडपाणी, मुख्य जलवाहिनी, सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी, जलवाहिनींचे काम केले जात आहे. या सगळ्यांसाठी विशेषत: विद्युत वाहिन्यांसाठी, केबल नेटवर्कसाठी भूमिगत ट्रंक प्रणालीचा (ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर) वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उच्च दाबाची असो किंवा अन्य कोणत्याही तारावरून जाणार नाही. यामध्ये नीटनेटकेपणा असावा, म्हणून सर्व वाहिन्या भूमिगत पद्धतीने नेण्यात येत आहे. शिवाय देखभाल-दुरुस्तीसाठी ही प्रणाली अधिक सोयीची ठरते. देशात प्रथमच अशा ट्रंक प्रणालीचा वापर आॅरिक सिटीत केला जात आहे.

७० टक्क्यांवर काम पूर्ण रस्ते, पदपथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधांचे ७० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. उड्डाणपुलांचीही उभारणी सुरू आहे. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे.  डिसेंबरपासून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद