शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अत्याचाराचा काळोख केव्हा होणार दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:12 IST

मेणबत्त्या पेटवून हिंगणघाट येथील मृत तरुणीस श्रद्धांजली

ठळक मुद्दे३० दिवसांच्या आत आरोपीला  शिक्षेची मागणीसंतप्त युवती, महिलांचा सवाल 

औरंगाबाद : तिला श्रद्धांजली अर्पण करताना काही जण नि:शब्द होते, तर काही जणांच्या भावना अनावर होत होत्या. अनेकांनी संताप व्यक्त केला. मेणबत्त्या पेटवून क्षणभर अंधार दूर होईल, पण अत्याचाराच्या स्वरुपात महिलांवर निर्माण झालेला खरा काळोख कधी दूर होणार? अमानवी प्रवृत्तीने बळी घेतलेल्या हिंगणघाटच्या  पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना सोमवारी शहरात श्रद्धांजली सभेप्रसंगी महिला, युवतींसह तरुणांनी हा प्रश्न उपस्थित केला. 

हिंगणघाट येथे पेटविण्यात आलेल्या युवतीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा निषेध करीत शहरातील विविध भागांमध्ये मेणबत्त्या पेटवून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. पैठणगेट येथील स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याच्या परिसरात सजग महिला संघर्ष समितीतर्फे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, डॉ. रश्मी बोरीकर, मंगल खिंवसरा, पद्मा तापडिया,  सुजाता पाठक, सुनीता जाधव, डॉ. मंजूषा शेरकर, हेमलता सोनटक्के, प्रतीक खडतकर, समीर देवकर, नितीन जोगदंड, संतोष सुरासे, पवन आडे, अर्जुन भूमकर, अतुल वाघमारे, प्रकाश हराळ, ओमकार आंबेकर, समाधान सोरमारे, नीलेश चौधरी, सागर इंगळे, असीम बेग, सीमा जिवरग, हेमलता सोनटक्के आदींसह युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.

डॉ. रश्मी बोरीकर म्हणाल्या, आरोपीला ३० दिवसांच्या आत कठोर शिक्षा झाली पाहिजे. कायद्यावर विश्वास आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच ही शिक्षा झाली पाहिजे. मंगल खिंवसरा म्हणाल्या, शासन, पोलीस प्रशासन आणि न्यायालयाची लोकांमध्ये असलेली प्रतिमा बदलली पाहिजे. आरोपीला कठोर शिक्षा झाली तरच आदरयुक्त भीती निर्माण होईल.

शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे श्रद्धांजलीक्रांतीचौक येथे शिक्षण क्षेत्रातील संघटनांतर्फे  औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठतर्फे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंडाची शिक्षा व्हावी व अशा घटना भविष्यात घडू नये, कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी शिक्षक क्रांतीचे प्रा. मनोज पाटील, आनंद खरात, पांडुरंग गोकुंडे, मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, भास्कर म्हस्के, नालमवार, अवद चाऊस, देवानंद वानखेडे, सुदर्शन पवार, नामदेव थोटे, शिरीष जाधव, भगवान पाटील, सचिन मिसाळ, प्रदीप विखे, प्रल्हाद शिंदे, संतोष जाधव, सुरेखा शिंदे, संध्या काळकर, सुरेखा शिंदे, संभाजी काळे, विजय नागरे, किशोर  चव्हाण, सुनील औटे आदी उपस्थित होते.

यासाठी स्वातंत्र्य मिळविले?स्वातंत्र्यसैनिक म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त क रते. परंतु आम्ही हे पाहण्यासाठी स्वातंत्र्य मिळविले का, यासाठीच आम्ही धडपड केली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. - ताराबाई लड्डा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी 

आजही भीती वाटतेआरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आजही घराबाहेर एकटे जात असताना भीती वाटते. भीतीच्या वातावरणाची ही परिस्थिती कधी बदलणार, असा प्रश्न आहे. - हेमलता सोनटक्के

टॅग्स :WomenमहिलाDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद