शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाणी आणण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 19:28 IST

शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील

औरंगाबाद : महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्या दिवशी झेंडावंदन व निकाल दाखविण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळा परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना सोबत पाण्याची बाटली आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दिवशी शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील व ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाची सुरुवात होईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले.

एका दिवशी पाणी दिल्याने झाडे वाचतील का, असा प्रश्न केला असता शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले, झाडे जगली पाहिजेत, त्यासाठी झाडांना पाणी दिले पाहिजे, हे संस्कार मुलांवर रुजावेत हा यामागचा हेतू आहे. विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १ मे रोजी शाळांमध्ये ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. १५ जूननंतर नियमित शाळा उघडतील. तेव्हा प्रामुख्याने शहर व परिसरातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने काही शाळांमध्ये भेटी देऊन या उपक्रमाबद्दल जागृती करण्यात आली. 

शाळांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३ लाख मुले व शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शाळांमध्ये ‘ग्रीन औरंगाबाद, ग्रीन स्कूल’ ही संकल्पना रुजवायची आहे. शाळा परिसरातील झाडे जगवायची आहेत व ती वाढवायची आहेत. ज्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल व पर्जन्यमान वाढीस मदत होईल. 

पर्यावरणाचे संतुलन राखावेच लागेलपर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्वपदावर आणण्याची नैसर्गिक क्षमता वृक्षांमध्ये आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे. च्निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल, तर झाडे लावणे व ती जगविणे गरजेचे आहे. त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले. १५ जूननंतर प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक हे आपापल्या शाळेतील एक झाड दत्तक घेतील. पाण्याच्या बाटलीमध्ये सुतळी टाकून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी बुजविले जाईल. त्यामुळे किमान ७ दिवस बाटलीतील पाणी झाडांना मिळेल. हे पाणी झाडाच्या मुळाशी किमान २१ दिवस ओलावा ठेवते. ज्यामुळे झाडे वाढतील व पर्यावरणास मदत होईल, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

टॅग्स :WaterपाणीNatureनिसर्गAurangabadऔरंगाबाद