शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाणी आणण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 19:28 IST

शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील

औरंगाबाद : महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्या दिवशी झेंडावंदन व निकाल दाखविण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळा परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना सोबत पाण्याची बाटली आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दिवशी शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील व ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाची सुरुवात होईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले.

एका दिवशी पाणी दिल्याने झाडे वाचतील का, असा प्रश्न केला असता शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले, झाडे जगली पाहिजेत, त्यासाठी झाडांना पाणी दिले पाहिजे, हे संस्कार मुलांवर रुजावेत हा यामागचा हेतू आहे. विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १ मे रोजी शाळांमध्ये ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. १५ जूननंतर नियमित शाळा उघडतील. तेव्हा प्रामुख्याने शहर व परिसरातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने काही शाळांमध्ये भेटी देऊन या उपक्रमाबद्दल जागृती करण्यात आली. 

शाळांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३ लाख मुले व शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शाळांमध्ये ‘ग्रीन औरंगाबाद, ग्रीन स्कूल’ ही संकल्पना रुजवायची आहे. शाळा परिसरातील झाडे जगवायची आहेत व ती वाढवायची आहेत. ज्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल व पर्जन्यमान वाढीस मदत होईल. 

पर्यावरणाचे संतुलन राखावेच लागेलपर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्वपदावर आणण्याची नैसर्गिक क्षमता वृक्षांमध्ये आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे. च्निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल, तर झाडे लावणे व ती जगविणे गरजेचे आहे. त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले. १५ जूननंतर प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक हे आपापल्या शाळेतील एक झाड दत्तक घेतील. पाण्याच्या बाटलीमध्ये सुतळी टाकून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी बुजविले जाईल. त्यामुळे किमान ७ दिवस बाटलीतील पाणी झाडांना मिळेल. हे पाणी झाडाच्या मुळाशी किमान २१ दिवस ओलावा ठेवते. ज्यामुळे झाडे वाढतील व पर्यावरणास मदत होईल, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

टॅग्स :WaterपाणीNatureनिसर्गAurangabadऔरंगाबाद