शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 11:13 IST

शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले.

औरंगाबाद : शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले. मात्र कचराकोंडीमुळे शहरातील जनता त्रस्त असताना महापालिकेतील सत्ता सोडण्यास भाजप तयार नाही, असे चित्र आहे. 

कचरा, जलवाहिनी, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांवरून मनपात सुरू झालेल्या राजकीय गदारोळाचा आठ दिवसांत सोक्षमोक्ष लागला नाही, तर भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून महापालिका बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करु असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आज पत्रकार स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती. 

तनवाणी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकण्याची काय गरज होती. पालिकेत महापौर शिवसेनेचा असताना तेथे जाऊन कचरा टाकून त्यांनी काय साध्य केले, कचऱ्याच्या प्रकरणात शासनाने ८१ कोटींचा डीपीआर मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक घेऊन मनपा बरखास्तीचे केलेले विधान चुकीचे नाही. पाच महिन्यांपासून पालिकेतील राजकारण, प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असेल तर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. खा. चंद्रकांत खैरे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शहरात कचरा टाकू देण्यास विरोध करीत आहेत. कचऱ्याचे राजकारण कोण करीत आहे, यातून स्पष्ट होते. खा. खैरे यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. दरम्यान भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या आंदोलकांवर कारवाईची मागणी केली.

आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार महापौर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना  कचरा समस्या महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची बैठक टाळून ते मातोश्रीवर बैठकीला ेगेले. यावरून शिवसेनेला किती गांभीर्य आहे, हे स्पष्ट होते. परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून बरखास्तीबाबत निवेदन देण्यात येईल, - किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष

पालिका बरखास्त करून प्रश्न सुटेल का?महापौर शिवसेना-भाजप युतीचा आहे. मागील २७ वर्षांपासून पालिकेत युती आहे. भाजपने सहकार्याची भावना ठेवली तर मिळून शहरातील समस्या सोडविणे शक्य होईल. राजकीय भावनेतून विधाने करण्यापेक्षा सोबत यावे. पालिकेतील चांगल्या आणि वाईट निर्णयाला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. पालिका बरखास्त करून प्रश्न सुटणार आहे का? - नंदकुमार घोडेले, महापौर

मला तर आत्महत्या करण्याची वेळ आणली असतीमाझ्या काळात शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण झाली असती तर शिवसेनेने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली असती.- भगवान घडामोडे, माजी महापौर, भाजप

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना