शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 11:13 IST

शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले.

औरंगाबाद : शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले. मात्र कचराकोंडीमुळे शहरातील जनता त्रस्त असताना महापालिकेतील सत्ता सोडण्यास भाजप तयार नाही, असे चित्र आहे. 

कचरा, जलवाहिनी, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांवरून मनपात सुरू झालेल्या राजकीय गदारोळाचा आठ दिवसांत सोक्षमोक्ष लागला नाही, तर भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून महापालिका बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करु असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आज पत्रकार स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती. 

तनवाणी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकण्याची काय गरज होती. पालिकेत महापौर शिवसेनेचा असताना तेथे जाऊन कचरा टाकून त्यांनी काय साध्य केले, कचऱ्याच्या प्रकरणात शासनाने ८१ कोटींचा डीपीआर मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक घेऊन मनपा बरखास्तीचे केलेले विधान चुकीचे नाही. पाच महिन्यांपासून पालिकेतील राजकारण, प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असेल तर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. खा. चंद्रकांत खैरे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शहरात कचरा टाकू देण्यास विरोध करीत आहेत. कचऱ्याचे राजकारण कोण करीत आहे, यातून स्पष्ट होते. खा. खैरे यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. दरम्यान भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या आंदोलकांवर कारवाईची मागणी केली.

आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार महापौर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना  कचरा समस्या महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची बैठक टाळून ते मातोश्रीवर बैठकीला ेगेले. यावरून शिवसेनेला किती गांभीर्य आहे, हे स्पष्ट होते. परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून बरखास्तीबाबत निवेदन देण्यात येईल, - किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष

पालिका बरखास्त करून प्रश्न सुटेल का?महापौर शिवसेना-भाजप युतीचा आहे. मागील २७ वर्षांपासून पालिकेत युती आहे. भाजपने सहकार्याची भावना ठेवली तर मिळून शहरातील समस्या सोडविणे शक्य होईल. राजकीय भावनेतून विधाने करण्यापेक्षा सोबत यावे. पालिकेतील चांगल्या आणि वाईट निर्णयाला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. पालिका बरखास्त करून प्रश्न सुटणार आहे का? - नंदकुमार घोडेले, महापौर

मला तर आत्महत्या करण्याची वेळ आणली असतीमाझ्या काळात शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण झाली असती तर शिवसेनेने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली असती.- भगवान घडामोडे, माजी महापौर, भाजप

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना