शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कचराकोंडी प्रश्नी शिवसेनेला आठ दिवसांची मुदत; भाजपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 11:13 IST

शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले.

औरंगाबाद : शिवसेनेने लुडबूड थांबविली, तर दीड महिन्यात शहर कचरामुक्त करून दाखवू, असे खुले आव्हान भाजपने गुरुवारी शिवसेनेला दिले. मात्र कचराकोंडीमुळे शहरातील जनता त्रस्त असताना महापालिकेतील सत्ता सोडण्यास भाजप तयार नाही, असे चित्र आहे. 

कचरा, जलवाहिनी, पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामांवरून मनपात सुरू झालेल्या राजकीय गदारोळाचा आठ दिवसांत सोक्षमोक्ष लागला नाही, तर भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून महापालिका बरखास्त करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करु असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आज पत्रकार स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान घडमोडे, नगरसेवक दिलीप थोरात, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती. 

तनवाणी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकण्याची काय गरज होती. पालिकेत महापौर शिवसेनेचा असताना तेथे जाऊन कचरा टाकून त्यांनी काय साध्य केले, कचऱ्याच्या प्रकरणात शासनाने ८१ कोटींचा डीपीआर मंजूर करून दिला. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक घेऊन मनपा बरखास्तीचे केलेले विधान चुकीचे नाही. पाच महिन्यांपासून पालिकेतील राजकारण, प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असेल तर ठोस निर्णय घ्यावाच लागेल. खा. चंद्रकांत खैरे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर आरोप करीत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शहरात कचरा टाकू देण्यास विरोध करीत आहेत. कचऱ्याचे राजकारण कोण करीत आहे, यातून स्पष्ट होते. खा. खैरे यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. दरम्यान भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रध्वजासमोर कचरा आणून टाकणाऱ्या आंदोलकांवर कारवाईची मागणी केली.

आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार महापौर व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना  कचरा समस्या महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची बैठक टाळून ते मातोश्रीवर बैठकीला ेगेले. यावरून शिवसेनेला किती गांभीर्य आहे, हे स्पष्ट होते. परिस्थिती सुधारली नाही तर येत्या आठ दिवसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून बरखास्तीबाबत निवेदन देण्यात येईल, - किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष

पालिका बरखास्त करून प्रश्न सुटेल का?महापौर शिवसेना-भाजप युतीचा आहे. मागील २७ वर्षांपासून पालिकेत युती आहे. भाजपने सहकार्याची भावना ठेवली तर मिळून शहरातील समस्या सोडविणे शक्य होईल. राजकीय भावनेतून विधाने करण्यापेक्षा सोबत यावे. पालिकेतील चांगल्या आणि वाईट निर्णयाला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. पालिका बरखास्त करून प्रश्न सुटणार आहे का? - नंदकुमार घोडेले, महापौर

मला तर आत्महत्या करण्याची वेळ आणली असतीमाझ्या काळात शहरातील कचऱ्याची समस्या निर्माण झाली असती तर शिवसेनेने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली असती.- भगवान घडामोडे, माजी महापौर, भाजप

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना