शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी विनयकुमार राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:11 IST

मावळते अधीक्षक मनिष कलवानिया नियुक्तीच्या प्रतीक्षेत, शहरातील आयपीएस उपायुक्तांच्या बदल्यांकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : गृहविभागातर्फे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी डॉ. विनयकुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील बारा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात सध्याचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या जागी राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.

राठोड सध्या ठाणे शहराच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रामनाईक तांडा, हाडोळी येथील असलेले राठोड यांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. ठाण्यामध्ये काही महिने परिमंडळ ५ चे उपायुक्त राहिल्यानंतर त्यांना वाहतूक विभागाचा पदभार देण्यात आला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर राठोड राज्यभरात चर्चेत आले होते.

आयपीएस उपायुक्तांच्या बदल्यांकडे लक्षशहरातील आयपीएस उपायुक्त नितीन बगाटे व नवनीत काँवत यांच्याही पदोन्नतीसह बदल्या प्रलंबित आहे. बुधवारच्या बदल्यांमुळे येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील आणखी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात प्रामुख्याने बगाटे व काँवत यांना अधीक्षक म्हणून कुठला जिल्हा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कलवानिया यांची प्रभावी कार्यकाळ२० एप्रिल, २०२२ रोजी मनिष कलवानिया जिल्ह्याच्या अधीक्षकपदी रुजू झाले होते. जवळपास २८ महिने कलवानी यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ प्रभावी राहिला. यात प्रामुख्याने त्यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी सुरू केलेले मोफत कौशल्य प्रशिक्षण राबवून नोकरी मिळवून देण्याच्या मोहिमेमुळे १०० पेक्षा अधिक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली. बुधवारच्या बदल्यांमध्ये मात्र कलवानिया यांच्यासह आयपीएस श्रीकृष्ण कोकाटे, नंदकुमार ठाकूर यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस