शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बीड बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार...? सहापदरीचे काम सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:14 IST

धूळ आणि पावसात चिखलाचा प्रश्न निकाली काढण्यावर भर

औरंगाबाद : बीड बायपासवरील सहापदरीचे काम सुरू झाले असून, पुलांची रुंदीदेखील वाढविण्यात आल्याने आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बीड बायपास रोडवरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे रेंगाळून पडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. यासाठी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतरही प्रशासकीय यंत्रणेने हा निर्णय घेतला. रस्त्यात अडसर ठरणारी विविध बांधकामे अतिक्रमण हटाव पथकाने काढली, तर अनेक बांधकामे नागरिकांनीही काढून घेतल्याने १५ मीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला मोकळा करून दिलेला आहे. त्यावर ६ मीटरच्या ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. संग्रामनगर पुलासह देवळाई, एमआयटी पुलाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याची तयारी होती. पुलांवरील मुख्य काम अद्याप बाकी असून, ते काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे. सहालाइनचे तसेच सर्व्हिस रोडचे देखील काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

वाहतूक कोंडी सुटावी..रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून वाहनांच्या धुराळ्याने वाहनधारक व पादचारी त्रस्त आहेत. सहापदरी होत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, त्यामुळे वाहतूक कोंडी लवकर सुटेल.- रोहन पवार, नागरिक

पुलाचे काम झपाट्याने पूर्ण करा...पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची लिमिट होती; परंतु ते अद्याप झालेले नाही. वळसा घेऊन आमदार रोडवर जावे लागत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करून पुलाखालून रस्ता सुरू करण्याची गरज आहे. - सविता कुलकर्णी

वाहतुकीची कोंडी सुटणार...रस्त्याच्या दुतर्फा वसाहतीत वाढ झालेली असून, त्यासाठी बीड बायपास रस्ता आता सहापदरी होत आहे. त्यात सर्व्हिस रस्त्याचाही समावेश होत आहे. धुळीचा त्रास कमीच होणार असून, भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. जनतेच्या सहकार्याची गरज आहे. - सुनील कोळसे, कनिष्ठ अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका