शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बीड बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार...? सहापदरीचे काम सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:14 IST

धूळ आणि पावसात चिखलाचा प्रश्न निकाली काढण्यावर भर

औरंगाबाद : बीड बायपासवरील सहापदरीचे काम सुरू झाले असून, पुलांची रुंदीदेखील वाढविण्यात आल्याने आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बीड बायपास रोडवरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे रेंगाळून पडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. यासाठी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतरही प्रशासकीय यंत्रणेने हा निर्णय घेतला. रस्त्यात अडसर ठरणारी विविध बांधकामे अतिक्रमण हटाव पथकाने काढली, तर अनेक बांधकामे नागरिकांनीही काढून घेतल्याने १५ मीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला मोकळा करून दिलेला आहे. त्यावर ६ मीटरच्या ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. संग्रामनगर पुलासह देवळाई, एमआयटी पुलाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याची तयारी होती. पुलांवरील मुख्य काम अद्याप बाकी असून, ते काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे. सहालाइनचे तसेच सर्व्हिस रोडचे देखील काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

वाहतूक कोंडी सुटावी..रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून वाहनांच्या धुराळ्याने वाहनधारक व पादचारी त्रस्त आहेत. सहापदरी होत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, त्यामुळे वाहतूक कोंडी लवकर सुटेल.- रोहन पवार, नागरिक

पुलाचे काम झपाट्याने पूर्ण करा...पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची लिमिट होती; परंतु ते अद्याप झालेले नाही. वळसा घेऊन आमदार रोडवर जावे लागत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करून पुलाखालून रस्ता सुरू करण्याची गरज आहे. - सविता कुलकर्णी

वाहतुकीची कोंडी सुटणार...रस्त्याच्या दुतर्फा वसाहतीत वाढ झालेली असून, त्यासाठी बीड बायपास रस्ता आता सहापदरी होत आहे. त्यात सर्व्हिस रस्त्याचाही समावेश होत आहे. धुळीचा त्रास कमीच होणार असून, भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. जनतेच्या सहकार्याची गरज आहे. - सुनील कोळसे, कनिष्ठ अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका