शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

बीड बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार...? सहापदरीचे काम सुरू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:14 IST

धूळ आणि पावसात चिखलाचा प्रश्न निकाली काढण्यावर भर

औरंगाबाद : बीड बायपासवरील सहापदरीचे काम सुरू झाले असून, पुलांची रुंदीदेखील वाढविण्यात आल्याने आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बीड बायपास रोडवरील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटनांमुळे रेंगाळून पडलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. यासाठी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतरही प्रशासकीय यंत्रणेने हा निर्णय घेतला. रस्त्यात अडसर ठरणारी विविध बांधकामे अतिक्रमण हटाव पथकाने काढली, तर अनेक बांधकामे नागरिकांनीही काढून घेतल्याने १५ मीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला मोकळा करून दिलेला आहे. त्यावर ६ मीटरच्या ६ पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. संग्रामनगर पुलासह देवळाई, एमआयटी पुलाचे काम ३१ मेअखेर पूर्ण करण्याची तयारी होती. पुलांवरील मुख्य काम अद्याप बाकी असून, ते काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली दिसत आहे. सहालाइनचे तसेच सर्व्हिस रोडचे देखील काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

वाहतूक कोंडी सुटावी..रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली तेव्हापासून वाहनांच्या धुराळ्याने वाहनधारक व पादचारी त्रस्त आहेत. सहापदरी होत असलेल्या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, त्यामुळे वाहतूक कोंडी लवकर सुटेल.- रोहन पवार, नागरिक

पुलाचे काम झपाट्याने पूर्ण करा...पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्याची लिमिट होती; परंतु ते अद्याप झालेले नाही. वळसा घेऊन आमदार रोडवर जावे लागत आहे. पुलाचे काम त्वरित पूर्ण करून पुलाखालून रस्ता सुरू करण्याची गरज आहे. - सविता कुलकर्णी

वाहतुकीची कोंडी सुटणार...रस्त्याच्या दुतर्फा वसाहतीत वाढ झालेली असून, त्यासाठी बीड बायपास रस्ता आता सहापदरी होत आहे. त्यात सर्व्हिस रस्त्याचाही समावेश होत आहे. धुळीचा त्रास कमीच होणार असून, भविष्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. जनतेच्या सहकार्याची गरज आहे. - सुनील कोळसे, कनिष्ठ अभियंता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका