शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

पाणंद रस्त्यांची कासव गती; आठ महिन्यांत अवघे ७४ रस्ते पूर्ण, दोषी कोण ?

By विजय सरवदे | Updated: December 5, 2023 13:31 IST

दिरंगाईसाठी ‘मनरेगा’ व ग्रामपंचायतींची एकमेकांकडे बोटे

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाने मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यासाठी १ हजार ५९० रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत अवघे ७४ रस्तेच पूर्ण होऊ शकले. त्यामुळे येणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीत रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, हा प्रश्न आहे.

दरम्यान, लटकलेल्या रस्ते कामांबाबत गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. या विभागामार्फत सांगितले जाते की, रोजगार हमीच्या कामांवर ५४ हजार मजूर काम करीत आहेत. एवढेच नव्हे, तर रोजगार हमीच्या कामांसाठी उद्दिष्टापेक्षा मनुष्य राबलेल्या दिवसांचे प्रमाण १५५ टक्के साध्य झाले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून गुरांचा गोठा, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी व अन्य कामांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ त्या कामांतच व्यस्त आहे. परिणामी, पाणंद रस्त्यांची कामे गतीने होत नाहीत. असे असले तरी, वर्षभरासाठी निश्चित केलेल्या रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाने सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे बोलले जाते.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा आहे. मात्र, पाणंद रस्ते अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याची ने-आण करताना मोठी कसरत करावी लागते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाणंद रस्त्याच्या कामावर भर दिला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याकडे मात्र, कोणी गांभीर्याने घेत नाही, हे विशेष!

७२३ कामे प्रगतिपथावरयासंदर्भात ‘मनरेगा’ विभागाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणंद रस्त्यांची जिल्ह्यात १ हजार ५९० कामे करण्याचे लक्ष आहे. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर कालावधी यापैकी ७४ पाणंद रस्ते तयार झाले असून, ७२३ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मार्चअखेरपर्यंत या रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी