शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

पाणंद रस्त्यांची कासव गती; आठ महिन्यांत अवघे ७४ रस्ते पूर्ण, दोषी कोण ?

By विजय सरवदे | Updated: December 5, 2023 13:31 IST

दिरंगाईसाठी ‘मनरेगा’ व ग्रामपंचायतींची एकमेकांकडे बोटे

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाने मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून यंदा जिल्ह्यासाठी १ हजार ५९० रस्ते तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंत आठ महिन्यांच्या कालावधीत अवघे ७४ रस्तेच पूर्ण होऊ शकले. त्यामुळे येणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीत रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल, हा प्रश्न आहे.

दरम्यान, लटकलेल्या रस्ते कामांबाबत गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. या विभागामार्फत सांगितले जाते की, रोजगार हमीच्या कामांवर ५४ हजार मजूर काम करीत आहेत. एवढेच नव्हे, तर रोजगार हमीच्या कामांसाठी उद्दिष्टापेक्षा मनुष्य राबलेल्या दिवसांचे प्रमाण १५५ टक्के साध्य झाले आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून गुरांचा गोठा, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी व अन्य कामांनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ त्या कामांतच व्यस्त आहे. परिणामी, पाणंद रस्त्यांची कामे गतीने होत नाहीत. असे असले तरी, वर्षभरासाठी निश्चित केलेल्या रस्त्यांची कामे करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाने सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे बोलले जाते.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा आहे. मात्र, पाणंद रस्ते अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याची ने-आण करताना मोठी कसरत करावी लागते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाणंद रस्त्याच्या कामावर भर दिला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याकडे मात्र, कोणी गांभीर्याने घेत नाही, हे विशेष!

७२३ कामे प्रगतिपथावरयासंदर्भात ‘मनरेगा’ विभागाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणंद रस्त्यांची जिल्ह्यात १ हजार ५९० कामे करण्याचे लक्ष आहे. दरम्यान, एप्रिल ते नोव्हेंबर कालावधी यापैकी ७४ पाणंद रस्ते तयार झाले असून, ७२३ रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मार्चअखेरपर्यंत या रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी