शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका

By राम शिनगारे | Updated: May 9, 2024 17:34 IST

यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीत अवघ्या ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठीच्या नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा-२००९ नुसार (आरटीई) खासगी आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. या जागांवर गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शुल्कांची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. त्यामुळे खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याचेच स्पष्ट होत आहे. 

राज्य शासनाने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचे धाेरण स्वीकारले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या नोंदणीत सुरुवातीच्या १५ दिवसांमध्ये राज्यातील आरटीई पात्र ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांवर फक्त ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कालावधी वाढीव दिला असला तरी नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दुरापास्त असल्याची चिंता शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली .

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद