शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी उद्याचा शेवटचा दिवस, नवीन नियमांचा फटका

By राम शिनगारे | Updated: May 9, 2024 17:34 IST

यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. ३० एप्रिलपर्यंतच्या मुदतीत अवघ्या ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठीच्या नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा-२००९ नुसार (आरटीई) खासगी आस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. या जागांवर गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शुल्कांची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, यावर्षी शासनाने आरटीई शाळा आणि नोंदणीसंदर्भातील निकषांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. त्यामुळे खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याचेच स्पष्ट होत आहे. 

राज्य शासनाने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचे धाेरण स्वीकारले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या नोंदणीत सुरुवातीच्या १५ दिवसांमध्ये राज्यातील आरटीई पात्र ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांवर फक्त ५९ हजार ३४६ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन नोंदणीला १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कालावधी वाढीव दिला असला तरी नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दुरापास्त असल्याची चिंता शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली .

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद