शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:52 AM

वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राजेश सेठिया म्हणाले की, जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा कला जातो. मधुमहाबाबत जनजागृती करण्यासाठीदरवर्षी एक कल्पना वर्षभर राबविली जाते. यंदा ‘मधुमेह आणि स्त्री’ ही थीम घेण्यात आली आहे. जगभरात ९ कोटी महिलांना मधुमेह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासह त्यांना अधिक सजग करण्याचे उद्दिष्ट जागतिक मधुमेह फेडरेशनचे आगामी वर्षभर राहणार आहे. तसेच आरोग्यदायी भविष्य आमचा अधिकार हे ब्रीद घेऊन या आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये पुढील वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.महाराष्ट्रात मधुमेहाचे ६० लाख रुग्ण असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अनेक समस्या उद्भवत असून, त्यातूनच ताणतणाव वाढत आहेत. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. या आजारातून पुढे हृदयरोग, अर्धांगवायू, लैंगिक दुर्बलता यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेहाचा संबंध थेट बदलत्या जीवनशैलीशी असून, चांगल्या जीवनशैलीबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. मधुमेहाच्या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे धोकादायक पातळीवर आल्यानंतर प्रामुख्याने त्यावर उपचार केले जातात. तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमुळे तरुणांचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांसह योगासन व इतर प्रकारचे व्यायाम निरोगी शरीरासाठी केव्हाही चांगलेच. त्यासाठी तरुणांसह महिलांनीही व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले, तर कुठलाही आजार होणार नाही.चंदीगड मधुमेहाची राजधानीचंदीगड ही मधुमेह आजाराची राजधानी झाली असून, १३. ५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर १४. ५ टक्के मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर असून, १३ टक्के लोकांना मधुमेह आजार जडलेला आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक हे याच्या उंबरठ्यावर आहेत. याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृतीची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली आहे.