शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:52 IST

वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राजेश सेठिया म्हणाले की, जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा कला जातो. मधुमहाबाबत जनजागृती करण्यासाठीदरवर्षी एक कल्पना वर्षभर राबविली जाते. यंदा ‘मधुमेह आणि स्त्री’ ही थीम घेण्यात आली आहे. जगभरात ९ कोटी महिलांना मधुमेह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासह त्यांना अधिक सजग करण्याचे उद्दिष्ट जागतिक मधुमेह फेडरेशनचे आगामी वर्षभर राहणार आहे. तसेच आरोग्यदायी भविष्य आमचा अधिकार हे ब्रीद घेऊन या आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये पुढील वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.महाराष्ट्रात मधुमेहाचे ६० लाख रुग्ण असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अनेक समस्या उद्भवत असून, त्यातूनच ताणतणाव वाढत आहेत. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. या आजारातून पुढे हृदयरोग, अर्धांगवायू, लैंगिक दुर्बलता यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेहाचा संबंध थेट बदलत्या जीवनशैलीशी असून, चांगल्या जीवनशैलीबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. मधुमेहाच्या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे धोकादायक पातळीवर आल्यानंतर प्रामुख्याने त्यावर उपचार केले जातात. तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमुळे तरुणांचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांसह योगासन व इतर प्रकारचे व्यायाम निरोगी शरीरासाठी केव्हाही चांगलेच. त्यासाठी तरुणांसह महिलांनीही व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले, तर कुठलाही आजार होणार नाही.चंदीगड मधुमेहाची राजधानीचंदीगड ही मधुमेह आजाराची राजधानी झाली असून, १३. ५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर १४. ५ टक्के मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर असून, १३ टक्के लोकांना मधुमेह आजार जडलेला आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक हे याच्या उंबरठ्यावर आहेत. याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृतीची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली आहे.