शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या काळात संतुलित जीवनशैली हेच आरोग्याचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:52 IST

वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वाढते ताणतणाव, बदलती जीवनशैली, जंक फूड आणि आहाराच्या वेळा न पाळणे इ. मधुमेह उद्भवण्याची कारणे असून जीवनशैली संतुलित राखण्यासह व्यायामाबाबत सजग राहावे, असे सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेश सेठिया यांनी जागतिक मधुमेह दिनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांसह महिलांना दिला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राजेश सेठिया म्हणाले की, जगभरात १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा कला जातो. मधुमहाबाबत जनजागृती करण्यासाठीदरवर्षी एक कल्पना वर्षभर राबविली जाते. यंदा ‘मधुमेह आणि स्त्री’ ही थीम घेण्यात आली आहे. जगभरात ९ कोटी महिलांना मधुमेह आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासह त्यांना अधिक सजग करण्याचे उद्दिष्ट जागतिक मधुमेह फेडरेशनचे आगामी वर्षभर राहणार आहे. तसेच आरोग्यदायी भविष्य आमचा अधिकार हे ब्रीद घेऊन या आजाराबाबत सर्वसामान्यांमध्ये पुढील वर्षभर जनजागृती केली जाणार आहे.महाराष्ट्रात मधुमेहाचे ६० लाख रुग्ण असून, याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे अनेक समस्या उद्भवत असून, त्यातूनच ताणतणाव वाढत आहेत. ताणतणावांमुळे मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यांचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच मधुमेहासारखा आजार जडतो. या आजारातून पुढे हृदयरोग, अर्धांगवायू, लैंगिक दुर्बलता यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेहाचा संबंध थेट बदलत्या जीवनशैलीशी असून, चांगल्या जीवनशैलीबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात जनजागृतीची गरज आहे. मधुमेहाच्या आजाराबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. त्यामुळे धोकादायक पातळीवर आल्यानंतर प्रामुख्याने त्यावर उपचार केले जातात. तरुणांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे. टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमुळे तरुणांचेही व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. मैदानी खेळांसह योगासन व इतर प्रकारचे व्यायाम निरोगी शरीरासाठी केव्हाही चांगलेच. त्यासाठी तरुणांसह महिलांनीही व्यायामाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच व्यसनापासून दूर राहिले, तर कुठलाही आजार होणार नाही.चंदीगड मधुमेहाची राजधानीचंदीगड ही मधुमेह आजाराची राजधानी झाली असून, १३. ५ टक्के लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे. तर १४. ५ टक्के मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्र हा दुस-या क्रमांकावर असून, १३ टक्के लोकांना मधुमेह आजार जडलेला आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक हे याच्या उंबरठ्यावर आहेत. याचे गांभीर्य ओळखून याबाबत जनजागृतीची गरज डॉ. सेठिया यांनी व्यक्त केली आहे.