शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

तिरुपती रेल्वे रिकामीच रवाना

By admin | Updated: May 17, 2014 01:13 IST

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अचानकपणे बंद करण्यात आलेली औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची सेवा शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोणतीही घोषणा न करताच सुरू करण्यात आली

 औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अचानकपणे बंद करण्यात आलेली औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची सेवा शुक्रवारी दुपारी ३ वाजता कोणतीही घोषणा न करताच सुरू करण्यात आली. त्यामुळे तिला प्रवाशांचा अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. मोजके प्रवासी आणि रिकाम्या डब्यांसह रेल्वे औरंगाबाद स्थानकावरून रवाना झाली. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती ही रेल्वे बंद करण्यात आली होती; परंतु उन्हाळी हंगामातील वाढणार्‍या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे औरंगाबाद- तिरुपती रेल्वेची घोषणा करण्यात आली; परंतु ही घोषणा रेल्वे रवाना होण्याच्या केवळ एक दिवस आधी करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला होता. एका दिवसात कोणतेही नियोजन करण्याची वेळ दक्षिण मध्य रेल्वेने दिली नाही. त्यातही लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झालेला दिसून आला. त्यामुळे रेल्वेस्थानकावर ही रेल्वे आल्यावर प्रवाशांची संख्या अत्यंत कमी दिसून आली. जवळपास तीन डब्बे पूर्णपणे रिकामे होते, तर उर्वरित डब्यांमध्ये अनेक जागा रिकाम्या होत्या. औरंगाबादहून ही रेल्वे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडामार्गे तिरुपतीला पोहोचणार आहे. त्यामुळे अनेक प्रवासी जालना, परभणी, पूर्णा, नांदेडसाठी बसले होते. रेल्वेची घोषणा अचानक केल्यामुळे प्रवासाचे नियोजन करण्यात धावपळ झाल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. शनिवारी ५.१० वाजता ही रेल्वे तिरुपतीहून औरंगाबादसाठी रवाना होईल. पन्नास टक्के अचानक घोषणा केल्यामुळे एका दिवसात प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळणार असा प्रश्न होता; परंतु ‘एसी’सह स्लीपर कोचमध्ये जवळपास ५० टक्के प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.