शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मनपावरच गुन्हे दाखल करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:11 IST

मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा प्रश्नात महापालिकेने घनकचरा नियमावली धाब्यावर बसविली आहे. नियमानुसार मनपाला कचरा जाळता येत नाही. जमिनीत खड्डे करून पुरता येत नाही. जलस्रोतामध्ये कचरा नेऊन टाकता येत नाही. मनपा प्रशासन याचाच आधार मागील चार महिन्यांपासून घेत आहे. आमखास तलावाजवळील कमल तलाव ५० लाख रुपये खर्च करून स्वच्छ करण्यात आला. त्याच तलावात महापालिका प्रशासन कचरा टाकत असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. आता खंडपीठानेच महापालिकेवर घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करायला हवेत.शहरात १६ फेब्रुवारीपासून अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण झाली आहे.५० लाख रुपये खर्चऐतिहासिक कमल तलावाला गतवैभव मिळावे म्हणून चार वर्षांपूर्वी शासनाने ५० लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून गाळ काढणे, तलावातील घाण, केरकचरा काढण्याचे काम महापालिकेने आपल्या पद्धतीने केले. तलाव विकसित करण्याचे काम झाले नाही. तलावातील पाण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आलेली आहे. तलावाच्या बाजूला नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात आले आहेत. नागरिक सायंकाळी, सकाळी येथे शुद्ध हवा मिळते म्हणून बसतात.डम्पिंग यार्डकमल तलावात मागील तीन महिन्यांपासून मध्यरात्री कचरा आणून टाकण्याचे पाप या भागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी करीत आहेत. तीन महिन्यांत कमल तलावाची अवस्था डम्पिंग यार्डसारखी झाली आहे. मनपाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवरच आता घनकचरा नियमावलीनुसार गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न