शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:20 IST

शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांत नाराजी

गंगापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली असून, पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी, खरीप पिकांचे नियोजन बिघडत असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच उत्पादनासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च वाढला असतानाच बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती नकोशी होत आहे. दुसरीकडे शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसाचा मागमूस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये अधिकच भर पडली असून पेरणीचे नियोजन पार कोलमडले आहे.

मजुरी वाढली, कर्ज मात्र वेळेवर नाही...शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून दर दिवसागणिक मजुरीचे दर वाढत आहेत. काही ठिकाणी मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या मशागतीचे नियोजन करावे लागत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना वेळेवर बँकेकडून पीककर्जही मिळत नसल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

खर्च वाढला, उत्पादनाची मात्र खात्री नाही...शेतकरी महागड्या आणि नामांकित कंपन्यांचे बियाणे अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करतात, तरीही अनेक वेळा उत्पादन निघाल्यावर बाजार व्यवस्थेकडून दर पाडले जातात. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते. अशा अनुभवामुळे शेतकरी मानसिक तणावात जातात आणि पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकतात.

अवकाळी बरसल्यानंतर मान्सून दीर्घ रजेवर...मे महिन्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या शेतीचे, कापून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान केले, तर काही शेतकऱ्यांच्या आशा पावसाने पल्लवित केल्या. दुसरीकडे शेतीच्या मशागतीला लागलेल्या शेतकऱ्यांची कामे आता पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबली आहेत. गेल्या १० दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नियमित झाल्यानंतरच पेरणी करण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर