शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मशागती आटोपल्या, बियाणांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:20 IST

शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांत नाराजी

गंगापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागतीची कामे जवळपास पूर्ण केली असून, पेरणीची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. परिणामी, खरीप पिकांचे नियोजन बिघडत असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच उत्पादनासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींचा खर्च वाढला असतानाच बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती नकोशी होत आहे. दुसरीकडे शासनाने हमीभावात किरकोळ वाढ केली, तर बियाण्यांच्या दरात १० टक्क्यांची वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसाचा मागमूस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये अधिकच भर पडली असून पेरणीचे नियोजन पार कोलमडले आहे.

मजुरी वाढली, कर्ज मात्र वेळेवर नाही...शेतीसाठी लागणाऱ्या मजुरांची उपलब्धता कमी होत असून दर दिवसागणिक मजुरीचे दर वाढत आहेत. काही ठिकाणी मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या वेळापत्रकानुसार, शेतीच्या मशागतीचे नियोजन करावे लागत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांना वेळेवर बँकेकडून पीककर्जही मिळत नसल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.

खर्च वाढला, उत्पादनाची मात्र खात्री नाही...शेतकरी महागड्या आणि नामांकित कंपन्यांचे बियाणे अधिकृत कृषी केंद्रातून खरेदी करतात, तरीही अनेक वेळा उत्पादन निघाल्यावर बाजार व्यवस्थेकडून दर पाडले जातात. परिणामी, शेतकऱ्यांची फसवणूक होते. अशा अनुभवामुळे शेतकरी मानसिक तणावात जातात आणि पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकतात.

अवकाळी बरसल्यानंतर मान्सून दीर्घ रजेवर...मे महिन्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या शेतीचे, कापून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान केले, तर काही शेतकऱ्यांच्या आशा पावसाने पल्लवित केल्या. दुसरीकडे शेतीच्या मशागतीला लागलेल्या शेतकऱ्यांची कामे आता पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबली आहेत. गेल्या १० दिवसांपासून पावसाने रजा घेतल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस नियमित झाल्यानंतरच पेरणी करण्यास कृषी विभागाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर