शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

व्याघ्र दिन विशेष : १३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार !

By गजानन दिवाण | Updated: July 29, 2020 13:36 IST

तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला.

ठळक मुद्देबुलडाण्यात स्थिरावलेल्या ‘टी१सी१’ वाघाचा संसार फुलणार प्रत्येक वाघ हा क्षेत्र, अन्न किंवा वाघीण यासाठी जंगल सोडतो.

- गजानन दिवाण 

औरंगाबाद : तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करून गेल्या काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात स्थिरावलेल्या ‘टी-१सी-१’ वाघाचा संसार फुलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या बैठकीत अभयारण्यात वाघीण सोडण्यावर एकमत झाले. तत्पूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज असल्याचे समितीतील सदस्यांनी स्पष्ट केले. 

ज्ञानगंगा अभयारण्यातील वाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब आणि अकोल्याचे विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार हे सदस्य आहेत. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने निर्देशित केलेले मानद वन्यजीव सदस्य जयंत वडतकर हेही सदस्य आहेत. सोमवारी अमरावतीत या समितीची बैठक झाली. ‘टी-१सी-१’ काही महिन्यांपासून या अभयारण्यात स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर वाघांच्या अधिवासाबाबत हा परिसर किती योग्य आहे? या ठिकाणी वाघीण सोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, यावर बैठकीत चर्चा झाली.

प्रत्येक वाघ हा क्षेत्र, अन्न किंवा वाघीण यासाठी जंगल सोडतो. ‘टी-१सी-१’ ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. त्याला अन्नासोबत योग्य अधिवास मिळाल्याचे सध्यातरी दिसत आहे, अशी माहिती वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीब यांनी दिली. या अभयारण्यात वाघ किंवा वाघीण सोडण्याआधी सुरक्षित कॉरिडॉर आणि अभयारण्यातील चराई, रस्ता या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी सांगितले. 

यवतमाळपासून बुलडाण्यापर्यंत...यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून सुरू झालेला या वाघाचा प्रवास ‘ज्ञानगंगा’मध्ये येऊन थांबला. टिपेश्वरमध्ये २०१६ जन्मलेल्या या ‘टी-१सी-१’ वाघाने जूनमध्ये टिपेश्वर सोडले. तेलंगणातील आदिलाबाद, पुढे नांदेड विभाग करीत तो किनवटला पोहोचला. पैनगंगा अभयारण्यात त्याने बराच काळ घालविला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याने अकोला विभागात प्रवेश केला आणि महिन्याच्या शेवटी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचला. चिखली, खामगाव करीत एक डिसेंबरला तो ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला. रेडिओ कॉलरमुळे त्याचा हा सर्व प्रवास जगासमोर आला. तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला.

टॅग्स :forestजंगलAurangabadऔरंगाबादTigerवाघ