शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

माझी रक्षा शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा; शिक्षकाने मृत्यूनंतरही दिली अनमोल शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 20:09 IST

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते.

ठळक मुद्देसेवानिवृत्त मुख्याध्यापकाची शेवटची इच्छा कुटुंबियांनी केली पूर्ण

केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा, अशी शेवटची इच्छा केऱ्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंतराव देवराव पांढरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण केली असून, शेतात रक्षा विसर्जित करून त्यावर पाच झाडे लावण्यात आली आहेत.

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. हनुमंतराव यांचे ९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक जमा झाले होते. अनेकांनी त्यांची रक्षा एखाद्या पवित्र स्थानी नदीत विसर्जित करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या मुलांनी वडिलांनी जिवंतपणी व्यक्त केलेली शेवटची इच्छा नातेवाइकांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी ही रक्षा स्वत:च्या शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले. उपस्थित अनेक नातेवाइकांनी या उपक्रमाची स्तुती केली.

सिल्लोड तालुक्यातील संस्कृतचे पहिले पीएच.डी.दिवंगत हनुमंतराव पांढरे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी १९७६ ला एमए, एमएड पूर्ण केले. १९७७-७९ ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. सिल्लोड तालुक्यातून संस्कृतमध्ये पीएच.डी. मिळविणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर ते माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पहिले मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुस्तीची मैदानेही गाजविले होती. सलग पाच-पाच तास पोहण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद