शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माझी रक्षा शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा; शिक्षकाने मृत्यूनंतरही दिली अनमोल शिकवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 20:09 IST

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते.

ठळक मुद्देसेवानिवृत्त मुख्याध्यापकाची शेवटची इच्छा कुटुंबियांनी केली पूर्ण

केऱ्हाळा : माझा मृत्यू झाला तर, माझी रक्षा नदीच्या पाण्यात टाकून प्रदूषण न करता आपल्या शेतात टाकून त्यावर पाच वृक्ष लावा, अशी शेवटची इच्छा केऱ्हाळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंतराव देवराव पांढरे यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी ही इच्छा पूर्ण केली असून, शेतात रक्षा विसर्जित करून त्यावर पाच झाडे लावण्यात आली आहेत.

हनुमंतराव पांढरे यांनी जिवंत असतानाच काही वर्षांपूर्वी आपल्या मृत्यूनंतर शेवटची इच्छा कुटुंबाला बोलून दाखविली होती, तसेच ती पूर्ण करण्याचे वचन त्यांनी घेतले होते. हनुमंतराव यांचे ९ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तीन दिवसांनंतर त्यांच्या रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक जमा झाले होते. अनेकांनी त्यांची रक्षा एखाद्या पवित्र स्थानी नदीत विसर्जित करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या मुलांनी वडिलांनी जिवंतपणी व्यक्त केलेली शेवटची इच्छा नातेवाइकांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी ही रक्षा स्वत:च्या शेतात विसर्जित करून त्यावर पाच वृक्ष लावले. उपस्थित अनेक नातेवाइकांनी या उपक्रमाची स्तुती केली.

सिल्लोड तालुक्यातील संस्कृतचे पहिले पीएच.डी.दिवंगत हनुमंतराव पांढरे हे शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी १९७६ ला एमए, एमएड पूर्ण केले. १९७७-७९ ला संस्कृतमध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळविली. सिल्लोड तालुक्यातून संस्कृतमध्ये पीएच.डी. मिळविणारे ते पहिले व्यक्ती ठरले. त्यानंतर ते माणिकनगर येथील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पहिले मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुस्तीची मैदानेही गाजविले होती. सलग पाच-पाच तास पोहण्याची त्यांची ख्याती होती. त्यांच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद