शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

थरारक ! लासूर स्टेशन येथे बाळासह आई व महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 19:08 IST

बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले.

औरंगाबाद : बाळासह दोन महिला रेल्वेखाली येण्यापासून बालंबाल बचावल्याची घटना रविवारी रात्री लासूर स्टेशन येथे घडली. ही प्रत्यक्ष घटना पाहणा-यांचा काळजाचा थरकाप उडाला. ‘नशीब बलवत्तर’ म्हणूनच या दोन्ही महिला आणि बाळ बालंबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी म्हटले.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रविवारी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास रवाना झाली.  ही रेल्वे रात्री १०.५५ वाजता लासूर स्टेशनवर पोहोचली. लासुर स्टेशन परिसरामध्ये कापूस वेचनीसाठी खंडवा (मध्यप्रदेश) येथील बरेच महिला-पुरुष कामगार आलेले आहेत. यातील काही कामगार या नंदीग्राम एक्स्प्रेसने मनमाडमार्गे खंडवा येथे जाण्यासाठी आले होते. काही वेळेनंतर येथून नंदीग्राम एक्स्प्रेस सुटली. खांडवा येथील चार महिला चार पुरूष दोनबाळांसह बोगी क्रमांक एस : ६-७ मध्ये जात होते. यावेळी एक महिला एक, एक पुरुष बोगीत गेले. परंतु इतरांना सोबत असलेल्या अधिक साहित्यामुळे चढताच आले नाही.

याच वेळी दोन महिलांनी चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एक महिला तोल जाऊन पडली. तिला मदत करण्याचा प्रयत्न करताना आणखी एक महिला बाळासह खाली पडली. हे तिघेही प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये सापडण्याच्या स्थितीत असताना ही बाब लासूर येथील  रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ धाव घेत त्यांना ओढून बाजूला केले. हे दृश्य पाहून नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये बसलेले अन्य महिला व पुरुष हे धावत्या रेल्वेतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना इतरांनी वेळीच रोखले. या घटनेत बालंबाल बचावल्याने सदर महिला घाबरून गेल्या. खाली पडल्याने जखमीही झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून देवगिरी एक्सप्रेसने त्यांना रवाना करण्यात आले. यासाठी लासूर स्टेशन व्यवस्थापक गुप्ता, पॉइंट्समन यादव यांनी मदत केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी