शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दहावीचा पेपर दिला अन् शेत तळ्यात पोहायला गेले, तिघांचा मृत्यू तर दोघे सुदैवाने बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 22:06 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

श्यामकुमार पुरे

सिल्लोड: औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावी कक्षेतील तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान तर इतर दोघे थोडक्यात बचावले. बुधवारी(30 मार्च) दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेरखान नासिरखांन पठान(वय १६, रा.उर्दू शाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज(वय १६, रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा) आणि अक्रमखान आयुबखान पठान(वय १६ वर्ष रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, रेहान खान इरफान खान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) आणि फैजानखान शफीखान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) हे या घटनेतून बचावले आहेत.

ठिबकच्या नळीने केला घात...ही पाच मुले बुधवारी सकाळी १०:३० वाजता अजिंठा येथील उर्दू शाळेत सायन्स सेकंडचा पेपर देण्यासाठी गेले होते. १ वाजता त्यांनी पेपर दिला आणि दुपारी घरात काही एक न सांगता अनाड रोडवरील अजिंठा येथील सतीश चव्हाण यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले. सर्व पाच मुलांना पोहता येत नव्हते मात्र ते नेहमी एका झाडाला ठिबकची नळी पकडून याच शेत तळ्यात आंघोळ करत असत. मात्र आज आंघोळ करत आतांना ती नळी तुटली आणि तिघांचा बुडून अंत झाला, तर दोघे बालंबाल बचावले. 

दोघांनी त्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला...

मयत झालेले तिघे आधी शेत तळ्यात उतरले आणि त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी गटांगळ्या खाल्या. हे दृश्य त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही मित्रानी बघितले. रेहणखान या मित्राने त्यां तिघांना  वाचविण्यासाठी त्यांच्या पायाचा आधार देण्याचा प्रयत्न केला. पाय धरून त्या तिन्ही मुलांनी वर येण्याचा प्रयत्न केला पण दैव खराब असल्याने ज्या मुलाचे पाय पकडून ते वरती येण्याचा प्रयत्न करत होते, तोच शेततळ्यात घसरत पाण्यात बुडाला.

नंतर हे सर्व होत असताना पाचवा मित्र फैजानखान त्यांना वाचविण्यासाठी ठिबक नळी पकडून पाण्यात गेला पण पाणी जवळपास १० ते १२ फूट खोल असल्याने त्याला त्यांना बाहेर काढणे जमले नाही. त्याने लगेच कसे तरी बाहेर येऊन शेजारी पाजारी असलेल्या काही लोकांना मदतीसाठी बोलावले पण त्यांना सुद्धा पोहता येत नसल्याने त्यांनी आणखी काही लोकांना बोलावून आणले. अखेर चांगले पोहणारे लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या पण तो पर्यंत तिघांची प्राण ज्योत मावळली होती.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी लोकमत ला दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsillod-acसिल्लोडDeathमृत्यू