शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन तास महामार्ग ठप्प

By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST

जिंतूर : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने वाटप करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा

जिंतूर : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने वाटप करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठींबा म्हणून २४ जून रोजी नांदेड - औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला़ तीन तास हा मार्ग बंद असल्याने हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे असलेली गावे स्टेट बँक आॅफ हैदराबाद व इंडिया यांना वर्ग करावीत, पीक कर्ज तातडीने वाटप करावे, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या याद्या तातडीने लावून अनुदान वाटप करावे, ज्यांची नावे सर्वेमध्ये नाहीत त्यांना पुन:सर्व्हे करून अनुदान द्यावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी २३ जूनपासून जिंतूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते़ उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या़विविध बँकांचे प्रतिनिधी जिंतूरात दाखल झाले, मात्र सकारात्मक तोडगा न निघाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सकाळी ११ वाजेपासूनच ग्रामीण भागातील नागरिक तहसील कार्यालयासमोर जमा झाले़ दुपारी ११़३० वाजेपासून २़३० पर्यंत सलग तीन तास जिंतूर - नांदेड महामार्ग कार्यकर्त्यांनी रोखला़ तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जिंतूर - परभणी रस्त्यावर व जिंतूर - जालना रस्त्यावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या़ दरम्यान, जिल्हाधिकारी हे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी औरंगाबादला गेल्याने महसूल प्रशासनात जबाबदार अधिकारी कोणीही हजर नव्हता़ त्यानंतर उपोषणाचे पडसाद मंत्रालयात पडले़ मंत्रालयातून मुख्य सचिवांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना दखल घेण्यासंदर्भात पत्र दिले़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी संबंधित आश्वासनाचे पत्र विजय भांबळे यांच्या सुपूर्द केले़ त्यानंतर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला़ या रास्ता रोकोसाठी विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत, शरद अंभुरे, नानासाहेब राऊत, विश्वनाथ राठोड, रामेश्वर जावळे, राजेंद्र लहाने, गंगाधर जवंजाळ, पुंजारे गुरुजी, शिवाजीराव देशमुख, राजू पहारे, गजानन कांगणे, गजानन चव्हाण, शौकतलाला, भाई मियाँ, विजय वाकळे, उत्तम जाधव, बाळासाहेब घुगे, अ‍ॅड़ विनोद राठोड, वैजनाथ पुणेकर, वासेफ सिद्दीकी, अ‍ॅड़ कुमार घनसावंत, प्रताप सोळंके, जगन जाधव, गंगाधर तरटे, संजय अंभोरे, राजेंद्र नागरे, हनुमंत भालेराव हे उपस्थित होते़ (वार्ताहर)अन् उपोषण सुटलेमुख्य सचिवांनी सकारात्मरित्या मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर राकाँचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले़ यामुळे आता शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मुख्य सचिवांनी घेतली दखलसंबंधित उपोषणाची मुख्य सचिवांनी मंत्रालयात दखल घेऊन तातडीने प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविले़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून भांबळे यांच्या मागण्याबाबत सकारात्मक पत्र आल्यानेच भांबळे यांनी उपोषण मागे घेतले़