शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार

By राम शिनगारे | Updated: August 12, 2023 19:30 IST

केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान दररोज शाळांमध्ये झेंडावंदन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी एक आदेश काढला. त्यानंतर सायंकाळी तीन दिवस झेंडावंदन करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे दिवसभर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले.

केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचना १० ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्या. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील सर्व शिक्षणाधिऱ्यांना आदेश काढला. या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्थांच्या कार्यलयावर तिरंगा फडकाविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी शनिवारी (दि.१२) सकाळी आदेश काढीत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. तिनही दिवस ध्वजारोहण करण्याची गरज नाही. केवळ १५ ऑगस्ट रोजीच शाळांनी ध्वजारोहण करावे असे स्पष्ट केले. सकाळी १२ वाजेच्या सुमारास निघालेला हा आदेश सायंकाळी ६ वाजता बदलण्यात आला. नव्या आदेशानुसार १३ ते १५ या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक गोंधळून गेले होते. दररोज ध्वजारोहण करायचे असेल तर त्याविषयीची नियमावलीही पाळावी लागणार आहे. जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकारी सुधारित आदेश वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढल्याची माहिती शिक्षण विभागातुन देण्यात आली.

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये 'हर घर तिरंगा'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी काढलेल्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, विभागांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी १३ ते १५ या कालावधीत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. राबविलेल्या उपक्रमांचे छायाचित्र संकेतस्थळासह सोशल मिडियावर टाकावे अशा सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndependence Dayस्वातंत्र्य दिनEducationशिक्षण