शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

By सुमित डोळे | Updated: June 10, 2023 12:23 IST

मुंबईच्या नेटवर्क कंपनीचा धक्कादायक घोटाळा; सायबर पोलिसांकडून छापा, व्यवस्थापक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने सेटअप तयार करून आयएलडी परवानाधारक गेट वे बायपास करुन हजारो आंतरराष्ट्रीय कॉल्स बेकायदेशीरपणे स्थानिक कॉल म्हणून वळवले. ज्यामुळे विदेशातून येणारे आयएसडी कॉल्स हे स्थानिक कॉल्स म्हणून नोंदवले गेले. परिणामी, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला गेलाच; परंतु देशाची सुरक्षाच भेदून त्याने हा प्रकार केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या टाटा कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जालना रस्त्यावरील कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून व्यवस्थापक सन्नी देवेंद्र (रा.छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.

इंटरनेट व इतर नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या या कंपनीने जालना रस्त्यावरील सागर ट्रेड सेंटरच्या एका गाळ्यात कार्यालय थाटले होते. सदर कंपनीच्या विनंतीवरून टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने त्यांना एसआयपी ट्रंक सर्व्हिस देण्यासाठी अटी शर्ती पूर्ण करून करार केला. त्या अंतर्गत कंपनीने सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्याने एसआयपी ट्रंक वापरण्यास सुरुवात केली. मे महिन्यात मात्र टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीला स्टार डिजिटल नेटवर्क कंपनी बेकायदेशीर पद्धतीने ॲप, सॉफ्टवेअरमध्ये बदल करून आयएसडी कॉल्स एसटीडी म्हणून मार्गस्थ करत आहे. याची पडताळणी केली असता दोन महिन्यांत असे अनेक कॉल्स स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीने वळवले असल्याचे समजले. त्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचे नोडल अधिकारी धनंजय यादव यांनी कंपनीच्या आदेशावरून शहर पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, सायबरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपास सुरू केला. गुरुवारी त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अभिलाष चौधरी यांनी छापा टाकला. तेव्हा सन्नी देवेंद्रला ताब्यात घेत झडती घेत आंतरराष्ट्रीय कॉल्स बायपास करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

नेमकी काय आहे गेटवे बायपास प्रक्रिया?टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनी डीओटी कार्यालयाचा परवाना घेऊन दूरसंचार सेवा पुरविते. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय कॉल्सची (आयएलडी) सेवा मिळण्यासाठी त्यांनी विदेश संचार निगम लि. कंपनीसोबत करार आहे. विदेशातून भारतात येणारे व भारतातून बाहेर जाणारे कॉल केवळ आयएलडी परवानाधारकांनाच अधिकृत आहेत. या कॉलचे आदानप्रदान आंतरराष्ट्रीय गेटवेद्वारे करणेच आवश्यक असते. खासगी कंपनी कॉल इतरत्र वळवू शकत नाही.

मग सेव्हन स्टार कंपनीने काय केले ?या कंपनीला टाटाकडून एक हजार कनेक्शन मिळाले होते. त्यातही ते केवळ नेटवर्कसाठी व मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने सेटअप करून आयएलडी परवानाधारक गेटवे बायपास केली. त्या आधारे आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक कॉल्स म्हणून रूपांतरित झाले. कॉल विदेशातून येत होते. मात्र, त्याची नोंद स्थानिक म्हणून होत गेली. हे कॉल्स कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येत नाही. म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका समजला जातो. शिवाय, आंतरराष्ट्रीय कॉल्सचा दर, परवान्याची किंमत कोटीत असल्याने शासनाचा महसूलदेखील बुडाला.

सर्वाधिक कॉल्स या देशातूनपोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांत या कंपनीने गेटवे बायपास करून तब्बल ५३ हजार ७०३ कॉल वळविले. यातील बहुतांश अमेरिका, सौदी, बहरीन, ऑस्ट्रेलिया देशांतून आले आहेत. या बेकायदेशीर कॉल्सची ओळख पटविता येत नसल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे पोलिस, टाटाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती