शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

By सुमित डोळे | Updated: June 10, 2023 12:23 IST

मुंबईच्या नेटवर्क कंपनीचा धक्कादायक घोटाळा; सायबर पोलिसांकडून छापा, व्यवस्थापक अटकेत

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने सेटअप तयार करून आयएलडी परवानाधारक गेट वे बायपास करुन हजारो आंतरराष्ट्रीय कॉल्स बेकायदेशीरपणे स्थानिक कॉल म्हणून वळवले. ज्यामुळे विदेशातून येणारे आयएसडी कॉल्स हे स्थानिक कॉल्स म्हणून नोंदवले गेले. परिणामी, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला गेलाच; परंतु देशाची सुरक्षाच भेदून त्याने हा प्रकार केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या टाटा कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जालना रस्त्यावरील कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून व्यवस्थापक सन्नी देवेंद्र (रा.छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.

इंटरनेट व इतर नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या या कंपनीने जालना रस्त्यावरील सागर ट्रेड सेंटरच्या एका गाळ्यात कार्यालय थाटले होते. सदर कंपनीच्या विनंतीवरून टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने त्यांना एसआयपी ट्रंक सर्व्हिस देण्यासाठी अटी शर्ती पूर्ण करून करार केला. त्या अंतर्गत कंपनीने सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्याने एसआयपी ट्रंक वापरण्यास सुरुवात केली. मे महिन्यात मात्र टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीला स्टार डिजिटल नेटवर्क कंपनी बेकायदेशीर पद्धतीने ॲप, सॉफ्टवेअरमध्ये बदल करून आयएसडी कॉल्स एसटीडी म्हणून मार्गस्थ करत आहे. याची पडताळणी केली असता दोन महिन्यांत असे अनेक कॉल्स स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीने वळवले असल्याचे समजले. त्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचे नोडल अधिकारी धनंजय यादव यांनी कंपनीच्या आदेशावरून शहर पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, सायबरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपास सुरू केला. गुरुवारी त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अभिलाष चौधरी यांनी छापा टाकला. तेव्हा सन्नी देवेंद्रला ताब्यात घेत झडती घेत आंतरराष्ट्रीय कॉल्स बायपास करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

नेमकी काय आहे गेटवे बायपास प्रक्रिया?टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनी डीओटी कार्यालयाचा परवाना घेऊन दूरसंचार सेवा पुरविते. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय कॉल्सची (आयएलडी) सेवा मिळण्यासाठी त्यांनी विदेश संचार निगम लि. कंपनीसोबत करार आहे. विदेशातून भारतात येणारे व भारतातून बाहेर जाणारे कॉल केवळ आयएलडी परवानाधारकांनाच अधिकृत आहेत. या कॉलचे आदानप्रदान आंतरराष्ट्रीय गेटवेद्वारे करणेच आवश्यक असते. खासगी कंपनी कॉल इतरत्र वळवू शकत नाही.

मग सेव्हन स्टार कंपनीने काय केले ?या कंपनीला टाटाकडून एक हजार कनेक्शन मिळाले होते. त्यातही ते केवळ नेटवर्कसाठी व मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने सेटअप करून आयएलडी परवानाधारक गेटवे बायपास केली. त्या आधारे आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक कॉल्स म्हणून रूपांतरित झाले. कॉल विदेशातून येत होते. मात्र, त्याची नोंद स्थानिक म्हणून होत गेली. हे कॉल्स कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येत नाही. म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका समजला जातो. शिवाय, आंतरराष्ट्रीय कॉल्सचा दर, परवान्याची किंमत कोटीत असल्याने शासनाचा महसूलदेखील बुडाला.

सर्वाधिक कॉल्स या देशातूनपोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांत या कंपनीने गेटवे बायपास करून तब्बल ५३ हजार ७०३ कॉल वळविले. यातील बहुतांश अमेरिका, सौदी, बहरीन, ऑस्ट्रेलिया देशांतून आले आहेत. या बेकायदेशीर कॉल्सची ओळख पटविता येत नसल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे पोलिस, टाटाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती