शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 19:01 IST

जे अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने मागितला निधीशासनाकडून अल्प तरतूद 

औरंगाबाद : अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी यंदा शासनाकडून पुरेशी तरतूद प्राप्त नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो मागासवर्गीय शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. अगोदर याद्या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली; पण जे अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षापासून सदरील लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या हस्तांतरण योजनेनुसार (डीबीटी) रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या शिष्यवृत्तीसाठी खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे अनु. जाती, जमाती, वि.जा.भ.ज. प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत.

यंदा जि.प. समाजकल्याण विभागाकडे अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे ६ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले होते; परंतु समाजकल्याण विभागाकडे अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीसाठी अपुरी तरतूद प्राप्त झाल्यामुळे अवघ्या २ हजार ७७९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही दोन टप्प्यांत वितरित केली जाते.

यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ५ हजार ४०५ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज व जि.प. समाजकल्याण विभागाकडे मुख्याध्यापकांकडून प्रमाणित याद्या प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार विद्यार्थ्यांसाठी पुरेल एवढीच तरतूद प्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी अगोदर प्राप्त झालेल्या याद्यांना प्राधान्य देण्यात आले. तब्बल ३ हजार ४०५ विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ७ हजार ४८० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यांच्या याद्याही समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्या; पण निधीअभावी अवघ्या २ हजार २४८ विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली. या प्रवर्गाचे ५ हजार २०० विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी समाजकल्याण विभागाने शासनाकडे २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. 

तरतूद आहे; पण वितरण थांबलेइयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी ५० लाखांची तरतूद प्राप्त आहे; पण समाजकल्याण विभागाने ६ हजार ४२२ पैकी २ हजार ८०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. ३ हजार ६२२ विद्यार्थी याद्या पडताळण्याच्या नावाखाली शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. दुसरीकडे, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ६ हजार ७८४ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा केली. आणखी २ हजार ६०० विद्यार्थी याद्या पडताळणीच्या नावाखाली शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद