शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ऊसतोड कामगारांची हजारो मुले हंगामी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत, शिक्षणात खंड पडण्याची शक्यता

By विजय सरवदे | Updated: November 15, 2022 19:12 IST

आता दिवाळीच्या सुटीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले. मात्र, पाहिजे तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत.

औरंगाबाद :शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऊसतोड कामगारांसोबत त्यांच्या मुलांना न पाठविता त्यांच्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला जि.प. शिक्षण विभागामार्फत हंगामी वसतिगृहे सुरू केली जातात. परंतु, यंदा आतापर्यंत अवघी तीन हंगामी वसतिगृहे सुरू झाली आहेत. दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यातून ऊसतोड कामगार प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात तसेच परराज्यांत स्थलांतरित होतात. हे कामगार आपल्या मुलांनाही सोबत घेऊन जात असल्यामुळे या मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच खंडित होते. ते टाळण्यासाठी जि. प. शिक्षण विभागाने मागील तीन- चार वर्षांपासून हंगामी वसतिगृहाचा उपक्रम हाती घेतला. यंदा शिक्षण विभागाने १४ ऑक्टोबरला किती मुलं अर्ध्यावर शाळा सोडून आपल्या पालकांसोबत ऊसतोडीसाठी जाणार आहेत, त्याचे सर्वेक्षण केले होते. तेव्हा जवळपास साडेतीन हजार स्थलांतरित मुलांची संख्या समोर आली. यातील बहुतांशी मुलं दिवाळीपूर्वीच येथून स्थलांतरित झाली होती.

तथापि, आता दिवाळीच्या सुटीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू झाले. मात्र, पाहिजे तेवढी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत. कन्नड आणि पैठण या दोन तालुक्यांत तीन वसतिगृहे सुरू झाली आहेत. यामध्ये कन्नड तालुक्यातील अंबाला येथील वसतिगृहाद्वारे १९३, पैठण तालुक्यातील गेवराई बासी येथे ७४ आणि अब्दुलापूर तांडा येथे १०० विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिक्षण हमी कार्ड देणारयासंदर्भात जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी सांगितले की, २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेद्वारे जिल्हा बाहेर स्थलांतरित विद्यार्थी तसेच इतर जिल्ह्यांतून या जिल्ह्यात येणारे स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. स्थलांतरित होणारे विद्यार्थी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात गेले तरी तेथे त्यांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी त्या मुलांना शिक्षण हमी कार्ड दिले जाणार आहे.

स्थलांतरित विद्यार्थ्यांना परत आणणारयासंदर्भात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले की, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान स्थलांतरित होणाऱ्या मुलांचा शोध घेणार आहोत. स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा प्रयत्नदेखील करणार आहोत. सध्या तीन हंगामी वसतिगृहांना परवानगी दिली आहे. काही गावांत शालेय व्यवस्थापन समित्यांमार्फत मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेEducationशिक्षण