शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादेत पाण्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:21 IST

गारखेडा भागातील बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी आदी वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नसल्याने मंगळवारी या भागातील संतप्त नागरिकांनी आ. अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देअतुल सावे : ‘माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा;’ आंदोलक महिला झाल्या आश्चर्यचकित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेडा भागातील बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी आदी वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नसल्याने मंगळवारी या भागातील संतप्त नागरिकांनी आ. अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांचे गा-हाणे ऐकण्यासाठी दुपारी १२.४५ वाजता भर उन्हात सावे यांना यावे लागले. त्यांनी कार्यालयात पाय ठेवण्यापूर्वीच महिलांना पाण्यासाठी माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा, असे म्हणताच आंदोलक महिला आश्चर्यचकीत झाल्या.भाजपचे पदाधिकारी गोविंद केंद्रे, राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी, मेहेरनगर आदी भागातील अनेक महिला आ. अतुल सावे यांच्या कार्यालयावर पोहोचल्या. कार्यालयासमोरील पायऱ्यांवरच महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचे मोठे शिष्टमंडळ आल्याची माहिती मिळताच पावणे एक वाजता आ. अतुल सावे आले. वाहनातून उतरताच त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वारावर उभ्या महिलांना माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा, असे सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाला कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्यासमोरच मनपाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना फोन लावला. तुमच्यामुळे माला आमदारकी सोडण्याची वेळ आली आहे. या भागातील पाणी प्रश्न सोडवा, असे सांगितले.नेहमीप्रमाणे चहेल यांनीही दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पाणी प्रश्न आठवडाभरात मिटला नाही तर हंडा मोर्चा काढू, असा इशारा महिलांनी दिला. यावेळी प्रणीला त्रिभुवन, मीना शेळके, कमल बडक, कांताबाई राठोड, सुवर्णा पिल्ले, शीलागाडेकर, सुरेखा घोरपडे, शारदा शिंदे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.सहा दिवसांपासून पाणी नाहीमंगळवारी सकाळी आंबेडकरनगर भागात सहा ते सात दिवस झाल्यानंतरही पाणी न आल्याने परिसरातील नागरिक, महिलांनी एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर येऊन संताप व्यक्त केला. नागरिकांनी नगरसेविका भारती सोनवणे यांच्याकडेही पाणी येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पाण्याच्या टाकीवर आले. उपअभियंता अशोक पद्मे, गिरी यांची भेट घेऊन वॉर्डात येऊन पाहणी करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादAtul Saaveअतुल सावेWaterपाणीWomenमहिला