शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:02 IST

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

ठळक मुद्देमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले.याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, असे असले तरी सलीम अली सरोवरातील पाणी वारंवार दूषित होत आहे. पाच-सात वर्षांपूर्वीदेखील सरोवरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर गतवर्षीही मासे मेल्याचा प्रकार घडला. रविवारी पुन्हा मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे बघायला मिळाले. पाण्यामध्ये माशांना जेवढा ऑक्सिजन मिळायला हवा, तेवढा मिळत नसल्याचे समोर आले आहे. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

मृत मासे केले नष्टमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले. या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

पुन्हा जलपर्णीचा वेढासरोवरातील जलपर्णींमुळे जलचर प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षजाती, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जलपर्णी नष्ट करण्याचे काम तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या उद्यान विभागाने केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा जलपर्णींचा तलावाला वेढा पडत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण