शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

सलीम अली सरोवरात हजारो मासे मृत; महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:02 IST

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

ठळक मुद्देमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले.याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

औरंगाबाद : ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे.

सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी महापालिकेने याठिकाणी २० कोटी रुपये खर्च करून एसटीपी प्लांट सुरू केला. त्यामुळे तलावाला मिळणारे ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, असे असले तरी सलीम अली सरोवरातील पाणी वारंवार दूषित होत आहे. पाच-सात वर्षांपूर्वीदेखील सरोवरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर गतवर्षीही मासे मेल्याचा प्रकार घडला. रविवारी पुन्हा मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे बघायला मिळाले. पाण्यामध्ये माशांना जेवढा ऑक्सिजन मिळायला हवा, तेवढा मिळत नसल्याचे समोर आले आहे. मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.

मृत मासे केले नष्टमासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले. या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

पुन्हा जलपर्णीचा वेढासरोवरातील जलपर्णींमुळे जलचर प्राणी, विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षजाती, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. त्यामुळे येथील जलपर्णी नष्ट करण्याचे काम तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या उद्यान विभागाने केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा जलपर्णींचा तलावाला वेढा पडत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण