शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

‘ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ जावं, काँग्रेस शुद्ध होईल’ : सचिन सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 2:44 PM

प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तरी लढू

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी वंचित बहुजन आघाडीचा फायदा कुणाला होतोय हे जनतेने ओळखले

औरंगाबाद : ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’, असा टोला आज येथे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाणला. ते गांधी भवनात औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. निरीक्षक म्हणून त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे होत्या. दुपारी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

‘वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे. आज संविधानाला धोका पोहोचत असताना सर्व धर्मनिरपेक्षशक्ती एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. खरं तर गांभीर्यानं घेता येईल, असा प्रस्ताव पाठवायला हवा; पण तसं त्यांच्याकडून होत नाही. ते सोबत आले नाहीत तरी आम्ही लढू’, असा इशाराही सावंत यांनी देऊन ठेवला. 

‘मुख्यमंत्र्यांना स्पॉण्डिलिसिस होईलएका प्रश्नाच्या उत्तरात सावंत उत्तरले की, मतांचा जोगवा मागण्यासाठी आता भाजप-शिवसेना यात्रा काढताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ आॅगस्टपासून सुरू होतेय; पण त्यांना ताठ मानेने जनतेसमोर जाता येणार नाही. तुम्हीही असे काही का करीत नाही, असे विचारता सावंत म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने महाराष्ट्र पिंजून काढला आहे. लोकसभेची पार्श्वभूमी विधानसभेत राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला पाकिस्तान धावून येणार नाही. फडणवीसांशी मुकाबला आहे. गोळवलकर गुरुजी-हेडगेवार यांच्या विचारांशी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुकाबला आहे. त्यात आमचाच विजय होईल. मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस उपाययोजना नाही. महाराष्ट्रभरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांवरून ते रथातून नव्हे, रणगाड्यातून जरी गेले तरी त्यांना स्पॉण्डिलिसिस झाल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. लोकांमध्ये आक्रोश आहे; पण मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. 

हा बाजार...ही अनैतिकताते म्हणाले की, भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या इनकमिंग सुरू आहे, ती सूज आहे. भाजपला स्वत:चे कार्यकर्ते तयार करता आलेले नाहीत. ईडीचा धाक दाखवून ते पक्षांतर करून घेत आहेत.हा बाजार आहे. ही अनैतिकता आहे. हा निर्लज्जपणा चाललाय. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. ज्यांना जायचंय ते गेले तरी नव्या जोमानं पक्ष उभा राहील. तरुणांना संधी मिळेल.

काँग्रेस जनतेचा पक्ष काँग्रेसला मोठा इतिहास आहे. १३२ वर्षांचा हा पक्ष आहे.  काँग्रेस ही मूव्हमेंट आहे. जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसने  अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. काँग्रेसला अशी आव्हाने नवी नाहीत. ते जातील, त्यांना लोकच धडा शिकवतील. यावेळी सिल्लोडमध्येही बदल होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गद्दारी केलेल्यांना जनता माफ करणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतvidhan sabhaविधानसभा