शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ जावं, काँग्रेस शुद्ध होईल’ : सचिन सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:46 IST

प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तरी लढू

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी वंचित बहुजन आघाडीचा फायदा कुणाला होतोय हे जनतेने ओळखले

औरंगाबाद : ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’, असा टोला आज येथे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाणला. ते गांधी भवनात औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. निरीक्षक म्हणून त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे होत्या. दुपारी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

‘वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे. आज संविधानाला धोका पोहोचत असताना सर्व धर्मनिरपेक्षशक्ती एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. खरं तर गांभीर्यानं घेता येईल, असा प्रस्ताव पाठवायला हवा; पण तसं त्यांच्याकडून होत नाही. ते सोबत आले नाहीत तरी आम्ही लढू’, असा इशाराही सावंत यांनी देऊन ठेवला. 

‘मुख्यमंत्र्यांना स्पॉण्डिलिसिस होईलएका प्रश्नाच्या उत्तरात सावंत उत्तरले की, मतांचा जोगवा मागण्यासाठी आता भाजप-शिवसेना यात्रा काढताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ आॅगस्टपासून सुरू होतेय; पण त्यांना ताठ मानेने जनतेसमोर जाता येणार नाही. तुम्हीही असे काही का करीत नाही, असे विचारता सावंत म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने महाराष्ट्र पिंजून काढला आहे. लोकसभेची पार्श्वभूमी विधानसभेत राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला पाकिस्तान धावून येणार नाही. फडणवीसांशी मुकाबला आहे. गोळवलकर गुरुजी-हेडगेवार यांच्या विचारांशी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुकाबला आहे. त्यात आमचाच विजय होईल. मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस उपाययोजना नाही. महाराष्ट्रभरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांवरून ते रथातून नव्हे, रणगाड्यातून जरी गेले तरी त्यांना स्पॉण्डिलिसिस झाल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. लोकांमध्ये आक्रोश आहे; पण मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. 

हा बाजार...ही अनैतिकताते म्हणाले की, भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या इनकमिंग सुरू आहे, ती सूज आहे. भाजपला स्वत:चे कार्यकर्ते तयार करता आलेले नाहीत. ईडीचा धाक दाखवून ते पक्षांतर करून घेत आहेत.हा बाजार आहे. ही अनैतिकता आहे. हा निर्लज्जपणा चाललाय. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. ज्यांना जायचंय ते गेले तरी नव्या जोमानं पक्ष उभा राहील. तरुणांना संधी मिळेल.

काँग्रेस जनतेचा पक्ष काँग्रेसला मोठा इतिहास आहे. १३२ वर्षांचा हा पक्ष आहे.  काँग्रेस ही मूव्हमेंट आहे. जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसने  अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. काँग्रेसला अशी आव्हाने नवी नाहीत. ते जातील, त्यांना लोकच धडा शिकवतील. यावेळी सिल्लोडमध्येही बदल होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गद्दारी केलेल्यांना जनता माफ करणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतvidhan sabhaविधानसभा