शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ जावं, काँग्रेस शुद्ध होईल’ : सचिन सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:46 IST

प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तरी लढू

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी वंचित बहुजन आघाडीचा फायदा कुणाला होतोय हे जनतेने ओळखले

औरंगाबाद : ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’, असा टोला आज येथे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाणला. ते गांधी भवनात औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. निरीक्षक म्हणून त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे होत्या. दुपारी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

‘वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे. आज संविधानाला धोका पोहोचत असताना सर्व धर्मनिरपेक्षशक्ती एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. खरं तर गांभीर्यानं घेता येईल, असा प्रस्ताव पाठवायला हवा; पण तसं त्यांच्याकडून होत नाही. ते सोबत आले नाहीत तरी आम्ही लढू’, असा इशाराही सावंत यांनी देऊन ठेवला. 

‘मुख्यमंत्र्यांना स्पॉण्डिलिसिस होईलएका प्रश्नाच्या उत्तरात सावंत उत्तरले की, मतांचा जोगवा मागण्यासाठी आता भाजप-शिवसेना यात्रा काढताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ आॅगस्टपासून सुरू होतेय; पण त्यांना ताठ मानेने जनतेसमोर जाता येणार नाही. तुम्हीही असे काही का करीत नाही, असे विचारता सावंत म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने महाराष्ट्र पिंजून काढला आहे. लोकसभेची पार्श्वभूमी विधानसभेत राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला पाकिस्तान धावून येणार नाही. फडणवीसांशी मुकाबला आहे. गोळवलकर गुरुजी-हेडगेवार यांच्या विचारांशी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुकाबला आहे. त्यात आमचाच विजय होईल. मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस उपाययोजना नाही. महाराष्ट्रभरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांवरून ते रथातून नव्हे, रणगाड्यातून जरी गेले तरी त्यांना स्पॉण्डिलिसिस झाल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. लोकांमध्ये आक्रोश आहे; पण मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे. 

हा बाजार...ही अनैतिकताते म्हणाले की, भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या इनकमिंग सुरू आहे, ती सूज आहे. भाजपला स्वत:चे कार्यकर्ते तयार करता आलेले नाहीत. ईडीचा धाक दाखवून ते पक्षांतर करून घेत आहेत.हा बाजार आहे. ही अनैतिकता आहे. हा निर्लज्जपणा चाललाय. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. ज्यांना जायचंय ते गेले तरी नव्या जोमानं पक्ष उभा राहील. तरुणांना संधी मिळेल.

काँग्रेस जनतेचा पक्ष काँग्रेसला मोठा इतिहास आहे. १३२ वर्षांचा हा पक्ष आहे.  काँग्रेस ही मूव्हमेंट आहे. जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसने  अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. काँग्रेसला अशी आव्हाने नवी नाहीत. ते जातील, त्यांना लोकच धडा शिकवतील. यावेळी सिल्लोडमध्येही बदल होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गद्दारी केलेल्यांना जनता माफ करणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतvidhan sabhaविधानसभा