शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली; चित्रा वाघ कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 16:54 IST

तोंडोळीतील घटना राजकारणाचा विषय नाही, परंतु अशा घटनानंतर राज्य सरकारकडून संवेदना दाखविली जात नाही.

ठळक मुद्देचित्रा वाघ यांनी तोंडोळी येथील पीडित कुटुंबीयांची घेतली भेट

औरंगाबाद : राज्यात कायद्याचा धाक न राहिल्याने महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचा आरोप भाजपा ( BJP ) नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी केला. राज्यात शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात महिला सुरक्षा नसल्याची टीकाही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढवून दोन महिलांवर अत्याचार केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शहरात पत्रकारांशी बोलताना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी माजी महापौर भगवान घडमोडे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष ॲड. माधुरी अदवंत, जि.प.महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पैठण तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष अमृता पालोदकर उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या, तोंडोळीतील घटना राजकारणाचा विषय नाही, परंतु अशा घटनानंतर राज्य सरकारकडून संवेदना दाखविली जात नाही. आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, पीडित कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा सरकारने अजूनही आणलेला नाही. महिला अत्याचारांच्या विषयावर राज्यपालांनी विशेष अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. पण मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनाच उलट पत्र लिहून इतर राज्यांतील महिला अत्याचारांचे दाखले दिले. महिला अत्याचारांविरोधात आम्ही बोलतो, तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडा असे म्हणणारे शिवसेना नेते संजय राऊत तोंडोळीतील घटनेवर गप्प का, असा सवाल वाघ यांनी केला.

औरंगाबाद पोलिसांची भूमिका संशयास्पदराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वाघ यांनी केला. न्यायालयाने बी समरीचा रिपोर्ट फेटाळून लावत या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता फेरचौकशी होणार आहे, पण अजूनही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपीला अटक न करता चौकशी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा