शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:09 IST

बुलढाणा अपघातावर खासदार इम्तियाज जलील संतापले; पहिल्यांदा समृद्धी महामार्ग बंद करण्याची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर: नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी तर, 'मी याला अपघात म्हणणार नाही, ही हत्या आहे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या' अशा शब्दात संताप व्यक्त केला. 

मन सुन्न करणाऱ्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर खासदार जलील यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सुविधा नसताना सरकार टिकेल कि नाही याची भीती असल्याने घाईत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. आज तर २५ जण गेले. मी याला अपघात नाही म्हणणार, ही हत्या आहे. यासाठी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री जबादार आहेत. आता ते फक्त सहानभूती मिळवण्यासाठी येत आहेत. पुन्हा एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी दोघे येतील. त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत ५ लाख रुपये आहे, अशी जोरदार टीका खा. जलील यांनी केली. 

समृद्धी महामार्ग तत्काळ बंद कराकुटलीही सुविधा नसताना घाईघाईत उद्घाटन केल्याने महामार्गावर मृत्यूसत्र सुरु आहे. देशात कोणत्याच मार्गावर एवढे अपघात झाले नाहीत. आता पहिल्यांदा हा महामार्ग काही दिवसांसाठी बंद करा. रोड सेफ्टी विभागाने अपघाताची कारणे शोधावी. फूडप्लाझा, स्वच्छातगृह सुविधा उभारा त्यानंतर महामार्ग पुन्हा सुरु करा, अशी मागणी खा. जलील यांनी यावेळी केली. 

आणखी एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी आलेहे तर दोघंही खूप ज्ञानी आहेत. गाडीमध्ये बसा, मीडियाला सोबत घेऊन पुन्हा एक इव्हेंट करा. कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, तेव्हा रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचं क्लिअरन्स मिळालं आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही. ज्या पद्धतीने यांनी उद्घाटनाचा इव्हेंट केला, फडणवीस गाडी चालवत होते, शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते, हा जो मीडिया इव्हेंट त्यांनी केला. त्यांना केवळ काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईत केलं. त्याचे हे परिणाम आहेत. मी याला अपघात नाही म्हणणार, या हत्या आहेत. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत., असेही खा. जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात