शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:09 IST

बुलढाणा अपघातावर खासदार इम्तियाज जलील संतापले; पहिल्यांदा समृद्धी महामार्ग बंद करण्याची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर: नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी तर, 'मी याला अपघात म्हणणार नाही, ही हत्या आहे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या' अशा शब्दात संताप व्यक्त केला. 

मन सुन्न करणाऱ्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर खासदार जलील यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सुविधा नसताना सरकार टिकेल कि नाही याची भीती असल्याने घाईत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. आज तर २५ जण गेले. मी याला अपघात नाही म्हणणार, ही हत्या आहे. यासाठी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री जबादार आहेत. आता ते फक्त सहानभूती मिळवण्यासाठी येत आहेत. पुन्हा एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी दोघे येतील. त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत ५ लाख रुपये आहे, अशी जोरदार टीका खा. जलील यांनी केली. 

समृद्धी महामार्ग तत्काळ बंद कराकुटलीही सुविधा नसताना घाईघाईत उद्घाटन केल्याने महामार्गावर मृत्यूसत्र सुरु आहे. देशात कोणत्याच मार्गावर एवढे अपघात झाले नाहीत. आता पहिल्यांदा हा महामार्ग काही दिवसांसाठी बंद करा. रोड सेफ्टी विभागाने अपघाताची कारणे शोधावी. फूडप्लाझा, स्वच्छातगृह सुविधा उभारा त्यानंतर महामार्ग पुन्हा सुरु करा, अशी मागणी खा. जलील यांनी यावेळी केली. 

आणखी एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी आलेहे तर दोघंही खूप ज्ञानी आहेत. गाडीमध्ये बसा, मीडियाला सोबत घेऊन पुन्हा एक इव्हेंट करा. कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, तेव्हा रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचं क्लिअरन्स मिळालं आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही. ज्या पद्धतीने यांनी उद्घाटनाचा इव्हेंट केला, फडणवीस गाडी चालवत होते, शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते, हा जो मीडिया इव्हेंट त्यांनी केला. त्यांना केवळ काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईत केलं. त्याचे हे परिणाम आहेत. मी याला अपघात नाही म्हणणार, या हत्या आहेत. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत., असेही खा. जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात