शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अपघात नव्हे शिंदे-फडणवीसांनी केलेली हत्या; समृद्धी मार्ग बंद करण्याची खा. जलीलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:09 IST

बुलढाणा अपघातावर खासदार इम्तियाज जलील संतापले; पहिल्यांदा समृद्धी महामार्ग बंद करण्याची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर: नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी तर, 'मी याला अपघात म्हणणार नाही, ही हत्या आहे; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली हत्या' अशा शब्दात संताप व्यक्त केला. 

मन सुन्न करणाऱ्या अपघातानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर खासदार जलील यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सुविधा नसताना सरकार टिकेल कि नाही याची भीती असल्याने घाईत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दररोज या मार्गावर अपघात होत आहेत. आज तर २५ जण गेले. मी याला अपघात नाही म्हणणार, ही हत्या आहे. यासाठी मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री जबादार आहेत. आता ते फक्त सहानभूती मिळवण्यासाठी येत आहेत. पुन्हा एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी दोघे येतील. त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत ५ लाख रुपये आहे, अशी जोरदार टीका खा. जलील यांनी केली. 

समृद्धी महामार्ग तत्काळ बंद कराकुटलीही सुविधा नसताना घाईघाईत उद्घाटन केल्याने महामार्गावर मृत्यूसत्र सुरु आहे. देशात कोणत्याच मार्गावर एवढे अपघात झाले नाहीत. आता पहिल्यांदा हा महामार्ग काही दिवसांसाठी बंद करा. रोड सेफ्टी विभागाने अपघाताची कारणे शोधावी. फूडप्लाझा, स्वच्छातगृह सुविधा उभारा त्यानंतर महामार्ग पुन्हा सुरु करा, अशी मागणी खा. जलील यांनी यावेळी केली. 

आणखी एक मिडिया इव्हेंट करण्यासाठी आलेहे तर दोघंही खूप ज्ञानी आहेत. गाडीमध्ये बसा, मीडियाला सोबत घेऊन पुन्हा एक इव्हेंट करा. कुठलाही एक्स्प्रेस किंवा सुपर एक्स्प्रेस वे तयार होतो, तेव्हा रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचं क्लिअरन्स मिळालं आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? मी फक्त याच अपघाताबद्दल बोलत नाही. ज्या पद्धतीने यांनी उद्घाटनाचा इव्हेंट केला, फडणवीस गाडी चालवत होते, शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते, हा जो मीडिया इव्हेंट त्यांनी केला. त्यांना केवळ काळजी होती, की आपली सत्ता गेली, तर दुसरं कोणीतरी येऊन उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईत केलं. त्याचे हे परिणाम आहेत. मी याला अपघात नाही म्हणणार, या हत्या आहेत. त्याला जबाबदार आहेत महाराष्ट्राचे हे दोन नेते, जे आज पुन्हा पाच लाख रुपयांची घोषणा करण्यासाठी आले आहेत., असेही खा. जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात