शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ही व्होट बँकेसाठी ‘नौटंकी’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खासदार जलील यांच्यावर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:01 IST

उपोषणाआडून सुरू आहे राजकारण : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम समाजाच्या मतांसाठी खा. इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकीय नौटंकी सुरू केल्याची जाेरदार टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. त्यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी येत आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आ. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थनदेखील त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा दिवसांपासून खा. जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाला पोलिस प्रशासनाने परवानगी कशी दिली? इतर आंदोलनांना पोलिस यंत्रणा परवानगी देत नाहीत. केंद्र व राज्यातील सत्ताधारी म्हणून आपले काय मत आहे, यावर डॉ. कराड म्हणाले, पोलिस आयुक्तांना भेटून या प्रकरणी निवेदन दिले आहे.

खा. जलील यांनी नामांतरावरून मतदानाची मागणी केली आहे. यावर डॉ. कराड म्हणाले, मतदान घेऊन सरकारचा निर्णय कसा काय बदलणार? कारण जनतेने निवडून दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहील. त्यामुळे खा. जलील यांना संसदीय राजकारणातील सहकारी म्हणून माझे आवाहन आहे की, त्यांनी हे राजकारण बंद करावे. उपोषणाच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था खराब करू नये. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय स्वीकारून विकासाच्या राजकारणावर भर द्यावा.त्यांनी आजवरच्या खासदारकीच्या कारकिर्दीत शहर व जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले आहे, हे देखील जाहीर करावे, असे आव्हान डॉ. कराड यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, एजाज देशमुख यांची उपस्थिती होती.

औरंगजेबाचा पुळका कशासाठी?सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले, मुस्लिमांमध्ये तरी औरंगजेब असे नाव मुलांचे ठेवले जाते काय? यावरून औरंगजेब किती क्रूर होता, याचा अंदाज येताे. खा. जलील यांना औरंगजेबाचा पुळका कशासाठी आहे, हे त्यांनी सांगावे. 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद