शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"हे सरकार थाटामाटात मरणार; जवान शहिद होत असतांना हे स्वत:वर फुलं उधळून घेतात"

By विकास राऊत | Updated: September 15, 2023 12:49 IST

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला; आता यांनी काय केले पाहिजे ?

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान केंद्र व राज्यातील सरकार थाटामाटातच मरणार आहे. आणि ती वेळ आम्ही आणणार आहोत. जवान शहिद होत असतांना पंतप्रधान, गृहमंत्री स्वत:वर फुलं उधळून घेतात. यांची माणसुकी कुठे गेली आहे, असा सवाल ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलतांना केला.

बेकायदेशीर राज्य सरकार मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसणार असून ते करीत असलेल्या उधळपट्टीचा त्यांना हिशेब द्यावा लागेल. असेही ते म्हणाले. विभागात दुष्काळ परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत. शनिवारच्या बैठकीतील पोपटपंचीकडे आमचे लक्ष राहणार आहे.

अमित शहा दिल्ली भेटत नाहीत गृहमंत्री अमीत शहा यांचा दौरा रद्द झाल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. ते दिल्लीत भेटत नाहीत, म्हणून इकडे भेटायला आलो होतो. मराठवाड्याचा अमृतकाळ कागदावर असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड आदींची उपस्थिती होती.

चाकूरकरांनी कोट बदलला तर राजीनामा दिला.....लष्कराचे अधिकारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले असताना पंतप्रधान स्वतः च्या कार्यालयात स्वतः वर फुलं उधळत होते. माजी गृहमंत्री चाकूरकर यांनी कोट बदलला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला, आणि इकडे पंतप्रधान आणि भाजप उत्साहात जल्लोष साजरा करतात. यांनी काय केले पाहिजे, असा सवाल खा.राऊत यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Rautसंजय राऊत