शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

दुष्काळात तेरावा महिना!

By admin | Updated: April 23, 2016 23:49 IST

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनी इंदेवाडीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. ऐन दुष्काळात जलवाहिनी फुटल्याने जालनेकरांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागणार आहे. जलवाहिनी फुटल्याने चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. घाणेवाडी जलाशय आटल्याने शहरातील नवीन जालना भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी जलवाहिनीचा दुरूस्तीचा प्रश्नही गाजत आहे. अशा परिस्थतीत एका दूरध्वनी सेवा देणाऱ्या कंपनीचे केबल अंथरण्याचे काम सुरू असताना पोकलॅनचा धक्का लागून जलवाहिनीचा पाईप निखळून गळती सुरू झाली. काही वेळातच परिसर जलमय झाला. दूरपर्यंत पाणी वाहून गेले. काही महिलांनी पाणी भरून घेतले. व्हॉल्व्ह बंद करेपर्यंत लाखो लिटर पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे परिसरातील दोन विहिरीही तुडुंब भरल्या होत्या. जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीच्या मुद्यावरून पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. संबंधित एजन्सी दुरूस्ती करण्यासाठी किती दिवस लावणार, पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबतच या जलवाहिनीस इतर ठिकाणीही गळती लागली आहे. व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पालिका प्रत्येक व्हॉल्व्हर लोखंडी जाळ्या बसविणार होती. चार महिने उलटल्यानंतरही पालिकेने या जाळ्या बसविलेल्या नाहीत. परिणामी व्हॉल्व्हमधून गळतीसोबतच चोरीही वाढली आहे. मुख्याधिकादी दीपक पुजारी हे वैद्यकीय रजेवर आहेत. कर्मचारी संपामुळे सर्व विभाग बंद आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी व कर्मचारी नसल्याने पालिका वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. त्यातच जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाणेवाडी जलाशय कोरडा पडल्याने नवीन जालना भागातील बहुतांश नागरिकांना जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. त्यातच आता जलवाहिनी फुटल्याने समस्या गंभीर बनत आहे. शहरात ठिकठिकाणी अंतर्गत जलवाहिनीला गळती लागली असली तरी पालिकेकडून कानाडोळा होत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली थातूरमातूर डागडुजी करून बिल उचलण्याचा सर्रास प्रकार पालिकेत सुरू असल्याचे चित्र आहे. इंदेवाडीसोबतच गोलापांगरी, शेवगा, हारतखेडा, मठपिंपळगाव पाटी, जामखेड पाटी, पाचोड रस्त्या, अंबड रस्ता आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला गळती लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगर पालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवावी, अशी मागणीही नागरिकांतून जोर धरत आहे. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग असून अडचण नसून खोळंबा असा बनला आहे. (प्रतिनिधी)जायकवाडी ते जालना जलवाहिनी फुटल्याने शहरवासियांना चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती मंगळवारपर्यंत पूर्ण होईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. कडक उन्हामुळे कूपनलिका आटल्या आहेत. त्यातच चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे. तरीही तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद राहील, असे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले.