शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरने भागतेय; मराठवाड्याचा टॅंकरवाडा होतोय का?

By स. सो. खंडाळकर | Updated: May 22, 2024 17:21 IST

चर्चा तर होणारच: टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात सुरूच आहे.

मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत असून, १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरने भागवली जात आहे. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात सुरूच आहे. मेच्या प्रारंभी विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत, तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे. 

सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. विभागातील जलसाठे आटू लागले आहेत. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.

जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला. ही सारी परिस्थिती पाहता मराठवाड्याचा टॅंकरवाडा होतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरचीच ही घडवून आणलेली चर्चा.

कोकण, कृष्णा आणि भंडारा येथून पाणी आणावं लागेलछत्रपती संभाजीनगर, जालना आणि कोकणच्या काही भागांसाठी कोकणकडे वाहून जाणारे १६० टीएमसी पाणी वळवावे लागणार आहे. हे काम युद्धपातळीवर करण्याची गरज आहे, तसेच कृष्णा खोऱ्यातून ४५ टीएमसी पाणी घेऊन लातूर, उस्मानाबाद व बीडच्या काही भागांची गरज भागवता येईल. नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांसाठी विदर्भातील भंडाराहून बुलढाणामार्गे पाणी आणून ते पैनगंगा-येलदरीत सोडता येईल. ५३ हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली, पण काम सुरू व्हायला पाहिजे.- शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ व अध्यक्ष मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान

दुष्काळ पडल्यावरच चर्चा सुरू होतेपाणी प्रश्न जाणीवपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तो होताना दिसत नाही. दुष्काळ पडल्यावर किंवा भीषणता वाढल्यानंतर चर्चा सुरू होते. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाच कृती कार्यक्रम दिसून येत नाही. जलयुक्त शिवारानं पाणी प्रश्न वाढणार आहे, असं माझं मत आहे.ही योजना शास्त्रशुध्द वनाही. कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तात्पुरत्या योजनांबरोबर दीर्घमुदतीच्या योजना हाती घेण्याची गरज आहे.- विजयअण्णा बोराडे, कृषि तज्ज्ञ

समन्यायी पाणी वाटपातही विलंब व अन्यायचसमन्यायी पाणी वाटपातही मराठवाड्यावर अन्यायच होत आलेला आहे. हे पाणी सोडायला एक तर विलंब केला जातो. यावर्षी याचा अनुभव आपण घेतला. एक तर वरच्या भागात अनावश्यक धरणं बांधून ठेवण्यात आली. त्यामुळे पाणी वरच्या वर अडवण्यात येते. समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा येतो, त्यावेळीही नगर- नाशिकची मंडळी कोर्टबाजी करताना दिसतात. पाणी सोडण्याची त्यांची भूमिका नसते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.- अनिल पटेल, माजी राज्यमंत्री

उकई धरणातून पाणी मिळायला पाहिजे....धुळ्याच्या उकई धरणातून १६० टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळायला हवे. कृष्णा खोऱ्याचे २३.६६ टीएमसी पाणी अद्याप मराठवाड्याला मिळालेले नाही. राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्याचा टँकरवाडा होतोय. जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पश्चिम वाहिन्यांच्या पाण्यामुळे प्रश्न सुटू शकतो. पण ते मृगजळच ठरण्याची शक्यता अधिक आहे.-रमेश गायकवाड, माजी सदस्य, छ. संभाजीनगर जिल्हा परिषद

पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात आणावेच लागेल.....पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात आणावेच लागणार आहे. नार, पार, दमणगंगा, वैतरणा, वैतरणा मध्य अशा नऊ उपखोऱ्यांतून हे पाणी दमणगंगेमार्फत गोदावरीत आणून सोडण्याची ही योजना आहे. मराठवाड्यातील १७ धरणांमध्ये या पाण्याचे लूक पद्धतीने वितरण करावे लागणार आहे. त्यावर तब्बल चाळीस हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुनरुज्जीवित केली आहे. ती पूर्ण झाली तर मराठवाड्याला टँकरवाडा होण्यापासून आपण वाचवू शकू.- प्रशांत बंब, आमदार, गंगापूर - खुलताबाद तालुका

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद