शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांचा तिसरा टप्पा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:34 IST

शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले.

ठळक मुद्देग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी शब्द पाळला

औरंगाबाद : शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय ‘लोकमत’ने चार वर्षांपासून लावून धरला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील साडे पाच हजार तर, दुसऱ्या टप्प्यांत साडे तीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया उपलब्ध असेल. याअंतर्गत जुने अर्जदेखील उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या अर्जात दुरूस्ती किंवा ते काढून टाकण्याची, शिवाय नव्याने अर्ज भरण्याची सुविधा देखील असेल.

अर्ज पूर्ण भरून सबमीट केल्यानंतरच तो विचारात घेतला जाणार आहे. संबंधित शिक्षकांना या अर्जात स्वत:चा मोबाईल भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या क्रमांकावर संबंधित शिक्षकाला ओटीपी दिला जाणार असून तो नमूद केल्यानंतरच अर्ज स्वीकारला जाणार आहे.

या बदल्या पूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार, म्हणजेच १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे रिक्त जागांची टक्केवारी १०पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त असल्यास तिथे बदली होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

१० टक्क्यांची अट कायम; अनेकांना फटकातिस-या टप्प्याच्या मागणीसाठी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने १७ आॅक्टोबर रोजी असिम गुप्ता, उपसचिव गिरीष भालेराव आणि अवर सचिव प्री. सी. कांबळे यांची मुंबईत भेट घेतली होती. लवकरच ही प्रक्रीया सुरू होईल, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. उद्यापासून होणा-या या बदल्यांमध्ये आधीप्रमाणेच १० टक्क्यांची अट कायम ठेवली असल्याने कोकणसह काही जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे. ही अट न ठेवता बदल्या करण्याच्या मागणीसाठी पुन्हा ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकTransferबदलीMaharashtraमहाराष्ट्र