शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांचा तिसरा टप्पा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:34 IST

शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले.

ठळक मुद्देग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी शब्द पाळला

औरंगाबाद : शिक्षकांची नविन भरती होण्याआगोदर म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा राबविण्यात येईल, हे दिलेले आश्वासन ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांनी पाळले. या बदल्यांची प्रक्रीया एक नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याचे आदेश बुधवारी निघाले.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय ‘लोकमत’ने चार वर्षांपासून लावून धरला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील साडे पाच हजार तर, दुसऱ्या टप्प्यांत साडे तीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांसाठी १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया उपलब्ध असेल. याअंतर्गत जुने अर्जदेखील उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या अर्जात दुरूस्ती किंवा ते काढून टाकण्याची, शिवाय नव्याने अर्ज भरण्याची सुविधा देखील असेल.

अर्ज पूर्ण भरून सबमीट केल्यानंतरच तो विचारात घेतला जाणार आहे. संबंधित शिक्षकांना या अर्जात स्वत:चा मोबाईल भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या क्रमांकावर संबंधित शिक्षकाला ओटीपी दिला जाणार असून तो नमूद केल्यानंतरच अर्ज स्वीकारला जाणार आहे.

या बदल्या पूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार, म्हणजेच १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे रिक्त जागांची टक्केवारी १०पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त असल्यास तिथे बदली होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

१० टक्क्यांची अट कायम; अनेकांना फटकातिस-या टप्प्याच्या मागणीसाठी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने १७ आॅक्टोबर रोजी असिम गुप्ता, उपसचिव गिरीष भालेराव आणि अवर सचिव प्री. सी. कांबळे यांची मुंबईत भेट घेतली होती. लवकरच ही प्रक्रीया सुरू होईल, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. उद्यापासून होणा-या या बदल्यांमध्ये आधीप्रमाणेच १० टक्क्यांची अट कायम ठेवली असल्याने कोकणसह काही जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे. ही अट न ठेवता बदल्या करण्याच्या मागणीसाठी पुन्हा ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकTransferबदलीMaharashtraमहाराष्ट्र