शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाराष्ट्राला आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही: संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 13:52 IST

Sanjay Rautनरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ?

औरंगाबाद : राज्यात दंगली पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे. राज्यात आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही, असे विरोधी पक्षाचे काम आहे. त्या सगळ्यांना आजचा आक्रोश मोर्चा इशारा आहे. शिवसेना आग असून आगीशी खेळू नका, असे गर्जना खा. संजय राऊत यांनी केली. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव पाच दहा रुपयांनी नव्हे, ५० रुपयांनी कमी करा मग महाराष्ट्रही विचार करेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. ते शहरात आयोजित आक्रोश मोर्चात बोलत होते. 

आज दुपारी शहरातील क्रांती चौक येथून शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघाला, मोर्चात मराठवाड्यातून आलेले शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चाचा समारोप गुलमंडी येथे झाला. समारोपाप्रसंगी  झालेल्या सभेत खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खा. संजय राऊत म्हणाले, मला भाजपवाले विचारात मोर्चा का काढत आहात. मी म्हटले मग काय थाळ्या वाजवायच्या का ? कोरोना हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाने थोपवला गेला, थाळ्या वाजवून काही होत नाही, हे कोरोना काळात सिद्ध झाले. आता महागाई विरोधात संघर्ष करण्याची वेळ आहे, महागाईविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. 

मोदींच्या घोषणांचे काय झाले ?नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी महागाई कमी करू, दरवर्षी २ कोटी रोजगार देईल, इंधन दर कमी होईल असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. महागाईवर बोला महटले की, चीन-पाकिस्तान, जातीय दंगली असे विषय काढायचे, असे सुरु आहे.  

नवाब मलीकांमुळे जरा शांतता

मंत्री नवाब मलिक यांनी सुरु केलेल्या कार्यक्रमामुळे विरोधीपक्ष शांत झाला आहे. त्यांच्या कडे खूप आहे, अजून तर आम्ही काढलेच नाही. विरोधी पक्ष सरकार पडण्याच्या तारखा देत आहे, त्यांनी तारखा देत राहाव्या सरकार स्थिर राहील. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबाद