शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

महाराष्ट्राला आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही: संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 13:52 IST

Sanjay Rautनरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ?

औरंगाबाद : राज्यात दंगली पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे. राज्यात आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही, असे विरोधी पक्षाचे काम आहे. त्या सगळ्यांना आजचा आक्रोश मोर्चा इशारा आहे. शिवसेना आग असून आगीशी खेळू नका, असे गर्जना खा. संजय राऊत यांनी केली. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव पाच दहा रुपयांनी नव्हे, ५० रुपयांनी कमी करा मग महाराष्ट्रही विचार करेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. ते शहरात आयोजित आक्रोश मोर्चात बोलत होते. 

आज दुपारी शहरातील क्रांती चौक येथून शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघाला, मोर्चात मराठवाड्यातून आलेले शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चाचा समारोप गुलमंडी येथे झाला. समारोपाप्रसंगी  झालेल्या सभेत खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खा. संजय राऊत म्हणाले, मला भाजपवाले विचारात मोर्चा का काढत आहात. मी म्हटले मग काय थाळ्या वाजवायच्या का ? कोरोना हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाने थोपवला गेला, थाळ्या वाजवून काही होत नाही, हे कोरोना काळात सिद्ध झाले. आता महागाई विरोधात संघर्ष करण्याची वेळ आहे, महागाईविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. 

मोदींच्या घोषणांचे काय झाले ?नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी महागाई कमी करू, दरवर्षी २ कोटी रोजगार देईल, इंधन दर कमी होईल असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. महागाईवर बोला महटले की, चीन-पाकिस्तान, जातीय दंगली असे विषय काढायचे, असे सुरु आहे.  

नवाब मलीकांमुळे जरा शांतता

मंत्री नवाब मलिक यांनी सुरु केलेल्या कार्यक्रमामुळे विरोधीपक्ष शांत झाला आहे. त्यांच्या कडे खूप आहे, अजून तर आम्ही काढलेच नाही. विरोधी पक्ष सरकार पडण्याच्या तारखा देत आहे, त्यांनी तारखा देत राहाव्या सरकार स्थिर राहील. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबाद