औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने एकाच कु टुंबातील लोकांना विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. किराडपुऱ्यातील एकाच कु टुंबातील ९ जणांना मंगळवारी शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली. यामध्ये पाच बालकांचा समावेश आहे. याच दिवशी कन्नड तालुक्यातील ८ जणांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. या सर्वांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात उष्णतेमुळे अन्नपदार्थ टिकण्याची क्षमता कमी होते. अन्नपदार्थ खराब झाल्यावर बुरशीसारख्या प्रकारात ते डोळ्यांनी सहज दिसूनही येते, तर अन्य वेळी चव आणि वास यातून पदार्थ खराब झाल्याचे लक्षात येते; परंतु अन्न वाया जाईल, या भावनेतून ते खाल्ले जाते. त्यातून विषबाधेचा धोका निर्माण होतो. विषबाधेची लक्षणेमळमळ होणे, चक्कर येणे, पोटात गोळा येणे, तोंडाला पाणी सुटणे, अतिसार अशी लक्षणे दिसून येतात. अनेकदा अन्नबाधा झाल्यानंतर घरगुती उपचार घेण्यावर भर दिला जातो. त्यातून बाधा वाढते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सेवा घेतली पाहिजे.गरजेइतके पदार्थ कराजेवढी गरज आहे तेवढेच पदार्थ तयार करण्यावर भर दिला पाहिजे. शिळे पदार्थ खाण्याचे टाळावे. मांसाहरी पदार्थ, दुधाचे पदार्थ, भाज्या याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. विषबाधेची लक्षणे दिसल्यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.-डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञताजे अन्नपदार्थ खाउन्हामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ खाण्यात आल्यास विषबाधा होते. या दिवसांमध्ये ताजे अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावे.-डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
उन्हाने वाढला अन्न विषबाधेचा धोका
By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST