शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

आता महाविद्यालयांमध्ये होणार दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील.

ठळक मुद्देविद्यापीठ : पदवी अभ्यासक्रमाची महाविद्यालयात, तर पदव्युत्तरची पदवी विद्यापीठात मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील. यात केवळ पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्या दिल्या जातील. पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी.ची पदवी ही विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा १५ मे रोजी आयोजित केला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मात्र, या दिवशी पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप होणार नसल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप १६ ते ३० मेदरम्यान महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये होणार आहे.यावर्षीपासून हा नवीन बदल करण्यात येत आहे. मुंबई, पुणे विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीचे महाविद्यालयात दीक्षांत सोहळे घेण्यात येतात. त्याचीच पुनरावृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांचीच पदवी प्रदान केली जाणार आहे. यामुळे महाविद्यालयांमध्येही दीक्षांत सोहळ्याची रेलचेल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियम कडक करणारविद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये महाविद्यालयांना दीक्षांत समारंभ किंवा विद्यार्थ्यांमध्ये पदव्यांचे वाटप करावे लागणार आहे. यासाठी विद्यापीठात पाळण्यात येणारे सर्व नियम महाविद्यालयांनाही पाळावे लागतील. कोणत्याही विद्यार्थ्याची पदवी गहाळ होणे, न देणे याला महाविद्यालयेच पूर्णपणे जबाबदारी राहतील, असेही डॉ. नेटके म्हणाले.विद्यार्थ्यांचे पदवी अर्ज भरून घेतले४विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा अर्ज दाखल करतानाच पदवीचेही अर्ज भरून घेतले असल्याची माहिती डॉ. नेटके यांनी दिली. यापूर्वी दीक्षांत सोहळ्यात १० टक्के विद्यार्थीही पदवी घेत नव्हते. यामुळे विद्यापीठाकडे लाखो पदव्या अनेक वर्षांपासून जमा आहेत. यातून विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडालेला आहे. यावर उपाय म्हणून अंतिम सत्राची परीक्षा देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून पदवी अर्ज भरून घ्यायचा आणि दीक्षांत सोहळा होताच पदवी संबंधित महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाल्याचेही डॉ. नेटके यांनी सांगितले. याची अंमलबजावणी १५ मेनंतर होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी