शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

वाळूज महानगरात जैवयांत्रिकी खत प्रकल्प येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:49 IST

सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देया प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ): सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून धुमसत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या कचरा प्रश्नावर अद्याप तोडगा निघत नसताना सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ओला, सुका व टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.३ वर्षांपासून सिडको हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवीत आहे. सिडकोने नवी मुंबई येथे जैव यांत्रिक खत प्रकल्प उभारून येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. 

सिडको वाळूज महानगरातून आजघडीला दररोज जवळपास तीन ते साडेतीन मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. दिवसेंदिवस सिडको परिसराचा झपाट्याने विकास होत असून, नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेसारखा कचरा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडको प्रशासन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काळजी घेत आहे.नवी मुंबईच्या धरतीवर येथे स्वतंत्र जैव यांत्रिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मुंबई कार्यालयास पाठविला आहे. या प्रस्तावला मुंबई येथील कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महानगर १ मध्ये होणार प्रकल्पया प्रकल्पासाठी सिडको वाळूज महानगर १ येथे जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून ४५० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

प्रकल्प फायदेशीरचया प्रकल्पापासून दुर्गंधी पसरत नसल्याने निवासी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही. कचरा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय प्रकल्पात तयार होणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. यातून सिडकोला उत्पन्न होणार आहे. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAgriculture Sectorशेती क्षेत्र