शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

वाळूज महानगरात जैवयांत्रिकी खत प्रकल्प येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:49 IST

सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देया प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ): सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून धुमसत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या कचरा प्रश्नावर अद्याप तोडगा निघत नसताना सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ओला, सुका व टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.३ वर्षांपासून सिडको हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवीत आहे. सिडकोने नवी मुंबई येथे जैव यांत्रिक खत प्रकल्प उभारून येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. 

सिडको वाळूज महानगरातून आजघडीला दररोज जवळपास तीन ते साडेतीन मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. दिवसेंदिवस सिडको परिसराचा झपाट्याने विकास होत असून, नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेसारखा कचरा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडको प्रशासन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काळजी घेत आहे.नवी मुंबईच्या धरतीवर येथे स्वतंत्र जैव यांत्रिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मुंबई कार्यालयास पाठविला आहे. या प्रस्तावला मुंबई येथील कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महानगर १ मध्ये होणार प्रकल्पया प्रकल्पासाठी सिडको वाळूज महानगर १ येथे जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून ४५० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

प्रकल्प फायदेशीरचया प्रकल्पापासून दुर्गंधी पसरत नसल्याने निवासी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही. कचरा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय प्रकल्पात तयार होणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. यातून सिडकोला उत्पन्न होणार आहे. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAgriculture Sectorशेती क्षेत्र