शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाळूज महानगरात जैवयांत्रिकी खत प्रकल्प येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:49 IST

सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देया प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

वाळूज महानगर ( औरंगाबाद ): सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून धुमसत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या कचरा प्रश्नावर अद्याप तोडगा निघत नसताना सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ओला, सुका व टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.३ वर्षांपासून सिडको हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवीत आहे. सिडकोने नवी मुंबई येथे जैव यांत्रिक खत प्रकल्प उभारून येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. 

सिडको वाळूज महानगरातून आजघडीला दररोज जवळपास तीन ते साडेतीन मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. दिवसेंदिवस सिडको परिसराचा झपाट्याने विकास होत असून, नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेसारखा कचरा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडको प्रशासन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काळजी घेत आहे.नवी मुंबईच्या धरतीवर येथे स्वतंत्र जैव यांत्रिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मुंबई कार्यालयास पाठविला आहे. या प्रस्तावला मुंबई येथील कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महानगर १ मध्ये होणार प्रकल्पया प्रकल्पासाठी सिडको वाळूज महानगर १ येथे जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून ४५० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. 

प्रकल्प फायदेशीरचया प्रकल्पापासून दुर्गंधी पसरत नसल्याने निवासी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही. कचरा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय प्रकल्पात तयार होणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. यातून सिडकोला उत्पन्न होणार आहे. 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAgriculture Sectorशेती क्षेत्र