शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'त्या' तलाठ्याच्या विशाखा समितीकडे होत्या तक्रारी; पोलिसांनी महसूल प्रशासनाकडून घेतली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:52 IST

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या अधिकारी - कर्मचारी मिळून १३ जणांची नावे लिहून ठेवली होती.

औरंगाबाद : अप्पर तहसीलअंतर्गत काम करणाऱ्या तलाठी लक्ष्मण बोराटेचे आत्महत्या प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. त्यांच्या व लिपिक डी. एस. राजपूत यांच्या विरोधात संजय गांधी योजना शहर कार्यालयातील सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे मध्यंतरी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची माहिती पोलिसांनी मंगळवारी घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी बोराटे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या अधिकारी - कर्मचारी मिळून १३ जणांची नावे लिहून ठेवली होती. या सगळ्या प्रकारामुळे महसूल प्रशासन हादरले असून पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.

बोराटे अप्पर तहसीलमध्ये रुजू होण्यापूर्वी संजय गांधी योजना विभागात कार्यरत होते. त्यांच्या व राजपूतच्या विरोधात १६ मार्च २०१८ रोजी एका महिला कर्मचाऱ्याने तहसीलदार, विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. सिटी चौक पोलिसांनी त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदार तायडे यांच्याकडून माहितीदेखील मागविल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. त्या तक्रारीमध्ये बोराटे आणि राजपूत यांच्या नावाचा उल्लेख आहे. अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले, पोलीस तपास करीत आहेत. मी रुजू झाल्यानंतर बोराटे माझ्याकडे एक-दोन वेळेस आले होते. काही जुन्या तक्रारी देखील त्यांच्या विरोधात होत्या. त्याची माहिती पोलीस घेत असल्याचे कानावर आले आहे.

आता पोलीस काय करणार ?पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. बोराटे यांच्यावर काही वैद्यकीय उपचार सुरू होते का, कार्यालयातील वागणूक आदी बाबींची माहिती घेत आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून १३ जणांची नावे बोराटे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणात कशी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू