शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

‘जलयुक्त’ची सुटी कामे नकोत, असा आग्रह होता; आता कालबद्ध चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 19:23 IST

जलयुक्त शिवारच्या कामाबद्दल सुरुवातीपासून लढत राहिले ते औरंगाबादचे प्रख्यात गांधीवादी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा.

- स.सो. खंडाळकर

जलयुक्त शिवारच्या कामांबाबत कॅगने ठपका ठेवल्यानंतर या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला. त्यावरून हा विषय पुन्हा चर्चिला जाऊ लागला. आरोप-प्रत्यारोप झडू लागले. जलयुक्त शिवारच्या कामाबद्दल सुरुवातीपासून लढत राहिले ते औरंगाबादचे प्रख्यात गांधीवादी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा. चौकशीच्या घोषणेनंतर देसरडा यांना काय वाटते, काय आहे त्यांची भूमिका यासंबंधीचा हा संवाद...

प्रश्न : एसआयटी चौकशीच्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया?उत्तर : मी या निर्णयाचे स्वागत करतो. जलयुक्त शिवारची कामे सुटी-सुटी करू नका, एकत्रित करा, हा माझा प्रारंभापासून आग्रह होता; पण सरकारने ऐकले नाही. मृदसंधारण, जलसंवर्धन व वनीकरण या एकात्मिक पद्धतीने व माथा ते पायथा या शास्त्रशुद्ध पद्धतीने हे काम झाले असते तर जमिनीत ओल टिकून राहण्याची व किमान एका पिकाची तरी हमी राहिली असती. लघु पाणलोट हा आधार सोडून व गाव आधार धरून ही कामे करण्यात आली.

प्रश्न : शास्त्रशुद्ध कामे न करण्यामागचे कारण काय?उत्तर : आधीच्या सरकारच्या काळात सिंचन घोटाळा गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्रात काही तरी वेगळे करून दाखवतोय ही भावना होती. शिवाय बगलबच्चे व कार्यकर्त्यांना चरण्यासाठी यातून कुरण निर्माण करून दिले गेले, असे दिसून येतेय. या कामासाठी ७५० कोटींची यंत्रे खरेदी करण्यात आली. का? यात काही फायदा होता म्हणूनच ना? जेसीबीची संख्या वाढली. सीएसआरचे पैसे याकामी वापरले. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे पाच हजार किलोमीटर नद्या, ओढे आणि पाणओहोळाचे उद्ध्वस्तीकरण झाले आहे.

प्रश्न : मग आपण काय केले?उत्तर : याविरुद्ध मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मी स्वत: ही केस लढवली. पाठपुरावा सुरू ठेवला. याचा निकाल २०१८ साली आला. या कामांवर कॅगनेच ठपका ठेवलाय.

प्रश्न : खरोखरच चौकशी होईल, असे वाटते का?उत्तर : कालबद्ध चौकशी व्हावी. अफरातफर व कामाची शास्त्रीय पद्धती याची चौकशी अपेक्षित आहे. कारण जलयुक्त शिवारमुळे आर्थिक हानीपेक्षाही पर्यावरणाची फार मोठी हानी झाली आहे. नदीकाठावर जिथे कामे झाली, ती ढासळली आहेत.

प्रश्न : एसआयटी कशी असावी?उत्तर : निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी स्थापन करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या पाहिजेत. उसाने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. हे सारे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शेती विकासाचा पाया घालून दिला, त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.

मृदसंधारण, जलसंवर्धन व वनीकरण या एकात्मिक पद्धतीने व माथा ते पायथा या शास्त्रशुद्ध पद्धतीने हे काम झाले असते तर जमिनीत ओल टिकून राहण्याची व किमान एका पिकाची तरी हमी राहिली असती.  

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार