शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सोनखेडा गावास बारा दिवसापासून पाणी नाही; अंतर्गत वादामुळे विहिरीचे अधिग्रहण होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 18:30 IST

ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव ही प्रशासनास दिला नसल्याने गावात पाण्याची सर्वत्र  बोंबाबोंब आहे.

खुलताबाद (औरंगाबाद ) :  तालुक्यातील सोनखेडा गावात ग्रामपंचायतीच्या अंतर्गत राजकारणामुळे गेल्या बारा दिवसापासून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

तालुक्यातील गदाणा जि.प.गटातील  सोनखेडा गाव असून या गावात गेल्या दोन महिन्यापासून पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. विशेष म्हणजे या जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुरेश सोनवणे यांचे हे गाव आहे. गावातील दोन विहिरी तालुका प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा आदेश असतानाही अंतर्गत वादामुळे या विहिरी आजही अधिग्रहीत झाल्या नाहीत. आज खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात सोनखेडा गावातील पाणीप्रश्नावरून चर्चा झाली. यात ज्यांच्या विहिरी अधिग्रहण केल्या आहेत ते शेतकरी पाणी संपल्याचे कारण देत पाणी देण्यास तयार नाहीत.

पाणीप्रश्न गंभीर असतांनाही गावातील राजकारणामुळे जो तो दुस-याच्या विहिरीला पाणी जास्त असल्याचे सांगत होता यावरून गावातील राजकारण पाण्यावरून चांगलेच पेटले असल्याचे दिसून आले. यातच गावात टँकरने पाणीपुरवठा करावा असे काहींचे मत आहे. पंरतू, ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव ही प्रशासनास दिला नसल्याने गावात पाण्याची सर्वत्र  बोंबाबोंब आहे. याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद