शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या स्वबळाच्या ‘जोर’बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:10 IST

निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

ठळक मुद्देयुतीसंदर्भात कोणत्याच राजकीय पक्षाचा निर्णय नाहीसहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप निर्विवाद वर्चस्व

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसंदर्भात ३ फेब्रुवारी रोजी वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

भाजप स्वबळाच्या दृष्टीने जोरदार तयारी करीत आहे. पक्षाकडून वॉर्डनिहाय बैठकींचा ‘सिलसीला’ सुरू झाला आहे. वंचित बहुजन आघाडीही स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना-काँग्रेससोबतच्या आघाडीत लढण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठांनी आघाडीसंदर्भात कोणतेच संकेत दिले नसल्याने स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने स्वबळासाठी कंबर कसली आहे.

महापालिकेत १९८८ पासून २०१५ पर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. स्वतंत्र निवडणुका लढवून परत सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येत. आता दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात युती केली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार किंवा नाही याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. ३ फेब्रुवारी रोजी वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्यावर ११५ वॉर्डांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील राजकीय रणनीती ठरविण्यावर सर्वच राजकीय पक्षांनी भर दिला आहे. समविचारी पक्षांसोबत ऐनवेळेपर्यंत युती होईल किंवा नाही, यावर कोणीच ठाम नाही. त्यामुळे बहुतांश पक्षांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.

शिवसेनेचीही स्वबळाचीच तयारीमहाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणताही निर्णय प्राप्त नाही. वरिष्ठांनी सांगितल्यानुसारच निवडणूक लढविण्यात येईल. आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षपातळीवर आम्ही स्वबळाच्या हिशोबाने तयारी पूर्णपणे करून ठेवली आहे.- आ. अंबादास दानवे, शिवसेना, जिल्हाप्रमुख

भाजपकडून स्वबळाची तयारीरिपाइं आठवले गट, वंचित बहुजन आघाडी यांना सोबत घेता येऊ शकते का, याची चाचपणी करीत आहोत. यासंदर्भात कोणताही निर्णय पक्षाची कोअर कमिटीच घेणार आहे. कोणासोबतही युती न झाल्यास स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. -संजय केणेकर, शहराध्यक्ष भाजप

राष्ट्रवादीचा फायदा आघाडीतराष्ट्रवादी काँग्रेसने मनपा निवडणूक आघाडीसोबत लढविल्यास फायदा होईल, असे वाटत आहे. वरिष्ठ यासंदर्भात जे आदेश देतील त्याचे पालन करण्यात येईल. पक्ष म्हणून स्वबळाची तयारी ठेवलेली आहे. -विजय साळवे, शहाराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

वरिष्ठांकडून कोणतेच संकेत नाहीतराज्यातील महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांकडून अद्याप कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. वरिष्ठांकडून ऐनवेळी आदेश आल्यास त्यादृष्टीने काम करण्यात येईल. स्वबळाच्या दृष्टीने आमची तयारी आहे.     -नामदेव पवार, शहाराध्यक्ष काँग्रेस

अद्याप कोणाचाही प्रस्ताव नाहीवंचित बहुजन आघाडीने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. कोणत्याच राजकीय पक्षाचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. एखाद्या पक्षासोबत युती करायची असेल तर अंतिम निर्णय पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर घेतील.    -अमित भुईगळ, ‘वंबआ’चे नेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक