शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

आघाडीची तूर्त घाई नाही, योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 4:54 AM

आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याची तूर्त घाई नाही. योग्य वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत उठलेल्या वावड्यांवर पडदा टाकला.

औरंगाबाद : आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याची तूर्त घाई नाही. योग्य वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबत उठलेल्या वावड्यांवर पडदा टाकला.काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, कोणासोबत आघाडी करायची यावर अजून निर्णय झालेला नाही. योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. शिवसेनेशी हातमिळवणी करणार काय? या प्रश्नावर ते म्हणाले, हातमिळवणीचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी हा पक्ष सत्तेबाहेर पडू शकणार नाही. एकनाथ खडसे यांना भाजपाने पक्षाबाहेर ढकलले तर त्यांना पक्षात घेऊ असेही ते म्हणाले़कोरेगाव भीमाची दंगल एक मोठे षड्यंत्रकोरेगाव भीमाची दंगल हे एक मोठे षड्यंत्र होते. जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यामागे हेतू होता; पण तो फसला. सरकारने मात्र या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतली. उलट कोम्बिंग आॅपरेशनच्या नावाखाली दलित बांधवांना त्रास दिला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस