शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'हॉस्टेलमध्ये त्रास होतोय',विद्यार्थिनीने भावाला सांगितले होते; आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 13:07 IST

हॉस्टेममध्ये आत्महत्येपूर्वी दिली होती भावाला त्रासाची माहिती, याबाबत लेखी तक्रारही केली होती

औरंगाबाद : वाणिज्य शाखेतील आरती सर्जेरावं कोल्हे या विद्यार्थिनीने शुक्रवारी सायंकाळी देवगिरी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख नव्हता तर केवळ जीवनावर भाष्य केल्याचे आढळून आले होते. दरम्यान, बहिणीला वसतिगृहात त्रास होता याबाबत लेखी तक्रारही देण्यात आली होती, अशी माहिती आरतीच्या भावाने दिली आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. 

देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात तिसऱ्या मजल्यावर रूम नंबर ४४ मध्ये बी.कॉम प्रथम वर्षातील आरतीने (२०, रा. गुरुपींप्री, ता. घनसावंगी, जि. जालना) आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. मात्र, या प्रकरणात आता नवीन वळण मिळालं आहे. आत्महत्या करण्याच्या काहीदिवस अगोदर आरतीने भाऊ गणेशला वसतिगृहात त्रास होत असल्याची माहिती दिली होती. या संदर्भात वसतिगृहात लेखी तक्रार देखील केली होती, अशी माहिती गणेश कोल्हेने  दिली आहे. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी आरतीच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन सुरु आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

आरतीचे वडील शेतकरी असून मोठ्या बहिनीचे लग्न झालेले आहे. १ ऑगस्टपासून ती वसतिगृहात शिकण्यासाठी आली होती. लहान बहीण व भाऊ शिक्षण घेत आहेत. आरती शांत स्वभावाची होती. फारशी बोलत नव्हती. तिला नैराश्य का आले? या घटनेच्या मागील कारणांचा शोध वेदांतनगर पोलीस घेत आहेत. तिच्या मृत्यूमुळे विद्यार्थिनींतून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीने वसतीगृह चांगले आहे. मैत्रिणींबद्दल काही तक्रार नाही. याशिवाय वैय्यक्तिक बरेच काही लिहिले आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. 

'काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही' , सुसाईड नोट सापडली‘जीवन हे सुंदर आहे.’ असे म्हणून तिने लिहायला सुरू केलेल्या पत्रात ‘जीवनात हार्ड वर्क केले पाहिजे. मीपण हार्ड वर्क करणार आहे. मी एक महिन्यापूर्वी इथे आले. माझे वसतिगृह, काॅलेज छान आहे. मैत्रिणीही खूप चांगल्या आहेत. मला जीवनाचा कंटाळा आलाय. मला या काळ्याकुट्ट जगात जगायचे नाही. हे ओझे कसे सांभाळायचे, मी गेल्यानंतर एकही मैत्रिणीने हॉस्टेल सोडू नका.’ असा आशय असून शेवटचा शब्द ‘अलविदा’ लिहिला आहे. या अडीच पानांच्या चिठ्ठीतून तिला नेमके काय म्हणायचे, तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय याबद्दल संभ्रम आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी