शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:30 IST

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे

औरंगाबाद : काही तरी गडबड आहेच. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य दिसत आहे. या सरकारचे राज्याकडे अजिबात लक्ष नाही. महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक प्रकल्प गुजरात या एकाच राज्याकडे जात आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंड्याच फोडायच्या, हनुमान चालिसाच वाचायची, असेच म्हणावे लागेल, असे परखड मत मंगळवारी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. पिके, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे झाले नाहीत. पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी पैसे मागत आहेत. संबंधित मंत्र्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. शेवटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे महत्त्वाचे आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत, याकडे लक्ष वेधले असता थोरात म्हणाले, याचे कारण त्यांनाच विचारले पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत. जनतेच्या भावना राज्यपालांना भेटून आम्ही कळवल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात देगलूर येथे येईल. नांदेड व शेगाव येथे जाहीर सभा होतील. ही यात्रा १४ दिवस महाराष्ट्रात राहील व २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात जाईल. जे जे पुरोगामी विचारसरणीचे आहेत, त्या सर्व पक्ष संघटनांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आमचे आवाहन आहे. ही यात्रा बेरोजगारी, महागाई या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधून भेदभावाच्या राजकारणाला मूठमाती देण्याचा संदेश देत आहे.

पत्रपरिषदेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आ. हम. एम. शेख, नामदेव पवार, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, हमद चाऊस, वरुण पाथ्रीकर, डॉ. अरुण शिरसाट, डॉ. नीलेश अंबेवाडीकर, मंजू लोखंडे, अनिता भंडारी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात