शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:51 IST

‘दमरे’कडून प्रस्तावच नाही, नवीन रेल्वे देण्याऐवजी रेल्वे बोर्डाचा ‘शाॅर्टकट’

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आला नव्हता. विस्तारीकरणाचा हा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके विस्तारीकरण का करण्यात आले, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. नांदेडहून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस देण्याऐवजी, आहे त्या रेल्वेचा विस्तार करण्याचा ‘शाॅर्टकट’ रेल्वे बोर्डाने घेतल्याचीही ओरड होत आहे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेली जात आहे. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसणार आहे. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून ८० टक्के प्रवाशांनी भरून जात असताना अचानक तिचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. छत्रपती संभाजीनगरहून प्रवाशांचा प्रतिसाद असताना आणि ‘दमरे’च्या नांदेड विभागाकडून विस्तारासंदर्भात कोणताही प्रस्ताव नसताना रेल्वे पळविण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

नव्या रेल्वेची मागणीनांदेडहून मुंबईसाठी वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करणे शक्य आहे. मुंबईस जाणाऱ्या रेल्वेची गरज पाहता किमान नांदेड ते दादरपर्यंतही नवी रेल्वे देणे शक्य आहे; परंतु नवी रेल्वे सुरू करण्याऐवीज आहे ती रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा सोपा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. यातून नांदेड येथील प्रवाशांची सुविधा होईल; परंतु याचा फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे.

काय म्हणाले रेल्वे अधिकारी?प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यासंदर्भात विभागाकडून काही प्रस्ताव दिला होता का?प्रदीप कामले : विभागाकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. हा रेल्वे बोर्डाचा निर्णय आहे.

प्रश्न : प्रस्ताव नसताना विस्तार का होत आहे?प्रदीप कामले : आमच्याकडे संघटनांकडून मागणी येते, ते आम्ही वर कळवितो. त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो.

प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून कधीपासून धावेल?प्रदीप कामले : याविषयी सध्या काही माहिती नाही. कार्यालयाला अधिकृत काही माहिती प्राप्त नाही.(प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नांदेड विभाग, ‘दमरे’)

नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी करणार....वंदे भारत ही रेल्वे सध्या जालना येथून मुंबईसाठी आहे. आता नांदेडपासून सुरू होणार असे वृत्त येत आहे. हे शहर औद्योगिक शहर आहे. त्यामुळे वंदे भारत ही नवीन रेल्वे येथून सोडावी. जर ते शक्य नसेल तर येथून ७५ लोकं बसतील एवढ्या क्षमतेची बोगी येथून जोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यासाठी या आठवड्यात त्यांना दिल्लीत भेटणार आहे.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड