शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:51 IST

‘दमरे’कडून प्रस्तावच नाही, नवीन रेल्वे देण्याऐवजी रेल्वे बोर्डाचा ‘शाॅर्टकट’

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आला नव्हता. विस्तारीकरणाचा हा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके विस्तारीकरण का करण्यात आले, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. नांदेडहून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस देण्याऐवजी, आहे त्या रेल्वेचा विस्तार करण्याचा ‘शाॅर्टकट’ रेल्वे बोर्डाने घेतल्याचीही ओरड होत आहे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेली जात आहे. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसणार आहे. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून ८० टक्के प्रवाशांनी भरून जात असताना अचानक तिचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. छत्रपती संभाजीनगरहून प्रवाशांचा प्रतिसाद असताना आणि ‘दमरे’च्या नांदेड विभागाकडून विस्तारासंदर्भात कोणताही प्रस्ताव नसताना रेल्वे पळविण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

नव्या रेल्वेची मागणीनांदेडहून मुंबईसाठी वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करणे शक्य आहे. मुंबईस जाणाऱ्या रेल्वेची गरज पाहता किमान नांदेड ते दादरपर्यंतही नवी रेल्वे देणे शक्य आहे; परंतु नवी रेल्वे सुरू करण्याऐवीज आहे ती रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा सोपा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. यातून नांदेड येथील प्रवाशांची सुविधा होईल; परंतु याचा फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे.

काय म्हणाले रेल्वे अधिकारी?प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यासंदर्भात विभागाकडून काही प्रस्ताव दिला होता का?प्रदीप कामले : विभागाकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. हा रेल्वे बोर्डाचा निर्णय आहे.

प्रश्न : प्रस्ताव नसताना विस्तार का होत आहे?प्रदीप कामले : आमच्याकडे संघटनांकडून मागणी येते, ते आम्ही वर कळवितो. त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो.

प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून कधीपासून धावेल?प्रदीप कामले : याविषयी सध्या काही माहिती नाही. कार्यालयाला अधिकृत काही माहिती प्राप्त नाही.(प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नांदेड विभाग, ‘दमरे’)

नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी करणार....वंदे भारत ही रेल्वे सध्या जालना येथून मुंबईसाठी आहे. आता नांदेडपासून सुरू होणार असे वृत्त येत आहे. हे शहर औद्योगिक शहर आहे. त्यामुळे वंदे भारत ही नवीन रेल्वे येथून सोडावी. जर ते शक्य नसेल तर येथून ७५ लोकं बसतील एवढ्या क्षमतेची बोगी येथून जोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यासाठी या आठवड्यात त्यांना दिल्लीत भेटणार आहे.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड