शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नांदेड विभागाकडून प्रस्तावच नाही; मग वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:51 IST

‘दमरे’कडून प्रस्तावच नाही, नवीन रेल्वे देण्याऐवजी रेल्वे बोर्डाचा ‘शाॅर्टकट’

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आला नव्हता. विस्तारीकरणाचा हा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके विस्तारीकरण का करण्यात आले, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. नांदेडहून नवीन वंदे भारत एक्स्प्रेस देण्याऐवजी, आहे त्या रेल्वेचा विस्तार करण्याचा ‘शाॅर्टकट’ रेल्वे बोर्डाने घेतल्याचीही ओरड होत आहे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेली जात आहे. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरला बसणार आहे. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून ८० टक्के प्रवाशांनी भरून जात असताना अचानक तिचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला. छत्रपती संभाजीनगरहून प्रवाशांचा प्रतिसाद असताना आणि ‘दमरे’च्या नांदेड विभागाकडून विस्तारासंदर्भात कोणताही प्रस्ताव नसताना रेल्वे पळविण्याच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

नव्या रेल्वेची मागणीनांदेडहून मुंबईसाठी वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करणे शक्य आहे. मुंबईस जाणाऱ्या रेल्वेची गरज पाहता किमान नांदेड ते दादरपर्यंतही नवी रेल्वे देणे शक्य आहे; परंतु नवी रेल्वे सुरू करण्याऐवीज आहे ती रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा सोपा पर्याय निवडल्याची चर्चा आहे. यातून नांदेड येथील प्रवाशांची सुविधा होईल; परंतु याचा फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे.

काय म्हणाले रेल्वे अधिकारी?प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यासंदर्भात विभागाकडून काही प्रस्ताव दिला होता का?प्रदीप कामले : विभागाकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. हा रेल्वे बोर्डाचा निर्णय आहे.

प्रश्न : प्रस्ताव नसताना विस्तार का होत आहे?प्रदीप कामले : आमच्याकडे संघटनांकडून मागणी येते, ते आम्ही वर कळवितो. त्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो.

प्रश्न : वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडहून कधीपासून धावेल?प्रदीप कामले : याविषयी सध्या काही माहिती नाही. कार्यालयाला अधिकृत काही माहिती प्राप्त नाही.(प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नांदेड विभाग, ‘दमरे’)

नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी करणार....वंदे भारत ही रेल्वे सध्या जालना येथून मुंबईसाठी आहे. आता नांदेडपासून सुरू होणार असे वृत्त येत आहे. हे शहर औद्योगिक शहर आहे. त्यामुळे वंदे भारत ही नवीन रेल्वे येथून सोडावी. जर ते शक्य नसेल तर येथून ७५ लोकं बसतील एवढ्या क्षमतेची बोगी येथून जोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यासाठी या आठवड्यात त्यांना दिल्लीत भेटणार आहे.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड